AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

राज्याच्या दृष्टीकोणातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांशी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते.

भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा Image Credit source: tv 9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 12, 2022 | 2:48 PM
Share

भंडारा : भंडारा ते गोसेखुर्द 50 किमी जलपर्यटन विकसित करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडाऱ्यात केली. जलपर्यटनामुळं भंडारा येथील लोकांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडून गोसेखुर्द जलपर्यटन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. मुख्यमंत्री दिवसभर भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पाण्याचं प्रदूषण होणार नाही. जलपर्णीदेखील जाईल. हे सगळं करत असताना पाणी कुठही प्रदूषित होणार नाही. याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. खासदार, आमदार व अधिकारी आहेत. मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे.

सरकारनं निर्णय घेतला की, तुमची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे. चांगले निर्णय घेतले. ते लोकांपर्यंत पोहचविण्याचं काम अधिकारी-पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. राज्याच्या दृष्टीकोणातून हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांशी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. गोसेखुर्द प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते संवाद साधत होते.

तीन महिन्यांत उद्योग बाहेर जायला ती जादूची कांडी आहे का, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला. राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हे भाष्य केलंय. महाविकास आघाडीला हा अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. आमचं सरकार उद्योगांना चालना देणार असल्याचंदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटलंय. नागपुरात विमानतळावर उतरल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

क्लस्टर प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं विरोधकांनी टीका केली आहे. या टीकेल्या एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. शिंदे म्हणाले, कुठलाही प्रकल्प तीन महिन्यात येतो आणि जातो असं कधी घडलेलं आहे का. ही काही जादूची कांडी नसते की, फिरवलं नि इकडं आला नि तिकडं गेला. आरोप करायचं तर कुणीही आरोप करू शकतो. आमचं सरकार उद्योगांचा चालना देणारं, उद्योगांचं स्वागत करणार सरकार आहे, असंही ते म्हणाले.

Follow Us
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.