AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘इकडचे जावई तिकडे विदर्भात कब्जा करतात, त्याचं काय करायचं’, भावना गवळींचा कुणाला टोला?

विदर्भातील मुली चांगल्या आहेत, पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे, इकडचे जावई तिकडे येऊन कब्जा करतात. त्याचं काय करायचं ते सांगा? असा सवाल उपस्थित करत भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटलांना टोला लगावला.

'इकडचे जावई तिकडे विदर्भात कब्जा करतात, त्याचं काय करायचं', भावना गवळींचा कुणाला टोला?
| Updated on: Aug 25, 2024 | 11:24 PM
Share

आमदार भावना गवळी यांनी आज माजी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला. नांदेड येथे आज मराठा – कुणबी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना आमदार भावना गवळी म्हणाल्या की, विदर्भातील मुली चांगल्या आहेत, पण एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे, इकडचे जावई तिकडे येऊन कब्जा करतात. त्याचं काय करायचं ते सांगा? असा सवाल उपस्थित करत भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटलांना टोला लगावला आहे. आमच्या पोरी इकडे दिल्या आहेत म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो. आम्हाला जावयाची थोडीशी जास्त सरबराई करावी लागेल, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

‘…तर केंद्रातील कॅबिनेट मंत्री मीच असते’

कार्यकर्ता म्हणून मी काम करते, नेता म्हणून माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही. कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आली असती तर केंद्रातील कॅबिनेट मंत्री मीच असते, असं म्हणत भावना गवळी यांनी मनातील खदखद व्यक्त केली. तसेच भविष्यात राज्यात मंत्री असू शकते. काही सांगता येत नाही, असं सूचक वक्तव्य भावना गवळी यांनी केलं.

‘शंकरराव चव्हाण यांना भारतरत्न मिळावा ही मागणी मोदीपर्यंत नेईन’

मराठा कुणबी मेळाव्यात शंकरराव चव्हाण यांना भारत मिळाला पाहिजे अशी मागणी केल्यानंतर भावना गवळी म्हणाल्या की, शंकरराव चव्हाण यांचे काम एवढं मोठ आहे, त्याची तुलना होऊ शकत नाही. भारतरत्न ही जी मागणी तुम्ही करताय ती रास्त मागणी आहे. तुम्ही जी मागणी करताय त्या मागणीला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्याच काम मी करेन. मी त्यांना राखी बांधते. काही गोष्टी अशा असतात, महिला म्हणून भाऊ ऐकतात, असं भावना गवळी म्हणाल्या.

भावना गवळी नेमकं काय म्हणाल्या?

“आपण सगे-सोयरे आहोत फक्त थोडीशी दुरुस्ती करायची आहे. विदर्भातील खूप सार्‍या मुली मराठवाड्यात आहेत. पण आम्ही विदर्भातील लोक साधेभोळे आहोत. विदर्भातील पोरी चांगल्या आहेत हे मान्य करावे लागेल. एक गोष्ट मात्र तेवढीच खरी इकडचे जावई तिकडे येऊन कब्जा करतात, त्याचं काय करायचं ते सांगा. तरी आम्ही तुम्हाला स्वीकारतो आमचं मन मोठं आहे”, असा टोला भावना गवळी यांनी हेमंत पाटील यांना लगावला. “आमच्या पोरी इकडे दिल्या आहेत म्हणून आम्हाला जावयाची थोडी जास्त सरबराई करावी लागेल”, असंदेखील भावना गवळी म्हणाल्या.

“न्याय हक्क मागण्यांसाठी आपण रस्त्यावर उतरलं पाहिजे. कुणबी-मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजे. पुढच्या काळात ते स्थापन होईल त्याची गॅरंटी मी घेते. मी मराठा – कुणबी समाजाच्या मागण्याच्या पाठीमागे ठामपणे राहील. मराठा – कुणबी समाज म्हणजे रत्नाची खाण आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करते नेता म्हणून माझ्या डोक्यात हवा गेली नाही, कदाचित मी सहाव्या वेळेला निवडून आले असती तर केंद्रातील कॅबिनेट मंत्री मीच असते. भविष्यात कदाचित राज्यातील असू शकते काही सांगता येत नाही. मला कुणीही किती रोखल तरी मी थांबणारी महिला नाही”, असं भावना गवळी म्हणाल्या.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.