AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे.

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग
uddhav thackerayImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 4:54 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं होतं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं दिसून येत आहे.  विधानसभा निवडणुकीपासून ते आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साध सोडली आहे. ही गळती रोखण्यात अजूनही पक्षाला यश आलेलं दिसून येत नाहीये. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे.  बडा नेता शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली असून, मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला देखील उपस्थित नसल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला पुन्हा एकदा खासदार संजय जाधव यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर परभणी लोकसभा मतदारसंघाची बैठकी बोलावली होती. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, परभणीचे आमदार राहुल पाटील उपस्थित होते.

दरम्यान नात्यातील विवाह समारंभ असल्यानं बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण यावर संजय जाधव यांनी दिलं आहे. मात्र एकीकडे खासदार संजय जाधव यांनी मातोश्रीवर आयोजित बैठकीला दांडी मारली आहे, तर दुसरीकडे मात्र ते मतदारसंघातील कार्यक्रमात दिसून येत आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे, दरम्यान या आधी देखील उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या खासदारांच्या महत्त्वाच्या बैठकीला संजय जाधव यांनी दांडी मारली होती. गेल्या मार्च महिन्यात उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावली होती. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा ते अनुपस्थित आहे. संजय जाधव यांच्यासोबतच परभणीचे जिल्हा प्रमुख गंगप्रसाद अहिरराव आणि चार तालुका प्रमुखांची देखील या बैठकीला अनुपस्थिति होती. दरम्यान चार दिवसांपूर्वी परभणीच्या गेस्ट हाऊसमध्ये आयोजित बैठकीमध्ये संजय जाधव यांनी आपल्या मनातील अस्वस्था शिवसैनिकांसमोर बोलून दाखवली होती.

Follow Us
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत