राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का, बड्या नेत्यानं सोडली साथ, राजकारणात मोठी खळबळ
राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे, बड्या नेत्यानं पक्षाची साथ सोडली आहे. नेत्यासह 15 नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला आहे. एकाचवेळी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी जिल्ह्यात मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे बार्शी तालुक्यातील राजकारणाची समीकरणे बदलणार आहेत. यापूर्वी निरंजन भूमकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बार्शी विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. मात्र त्यांनी आता राष्ट्रवादी अजित पवार गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत 15 नगरसेवकांनी देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान शिवसेना शिंदे गटात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्ष प्रवेश सुरूच असल्याचं पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यात ऑपरेशन टायगर पार पडलं. शिवसेना ठाकरे गटाकडे 9 खासदार होते, त्यातील 6 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता शिवसेना ठाकरे गटाकडे अवघे तीनच खासदार राहिले आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. महायुतीमध्ये राज्यात सर्वाधिक खासदार आता शिवसेना शिंदे गटाकडे आहेत.
दरम्यान विरोधी पक्षातून तर शिवसेना शिंदे गटात प्रवेश सुरूच होते, आता महायुतीमधून देखील पक्षप्रवेश होत असल्याचं पहायला मिळत आहे. वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह 15 नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान यावर अजून तरी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये, मात्र अशा पक्षप्रवेशांमुळे महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता नकारता येत नाही.