AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई महापालिकेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, उत्तर मुंबईतून एवढे नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात. यावर बोलताना मुंबई महापालिका निवडणुकीबाबत पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजप अ‍ॅक्शन मोडमध्ये, उत्तर मुंबईतून एवढे नगरसेवक निवडून आणण्याचं लक्ष्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 13, 2025 | 2:40 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होऊ शकतात. यामध्ये मुंबई महापालिका निवडणुकीचा देखील समावेश आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता मुंबई महापालिका निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत कोणाची सत्ता येणार? महापौर कोणत्या पक्षाचा असणार? याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते पियुष गोयल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, उत्तर मुंबईमधून किमान 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे, असं, गोयल यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले पियुष गोयल? 

उत्तर मुंबई सज्ज आहे, आगामी बीएमसी निवडणुकीबद्दल आम्ही खूप उत्सुक आहोत. उत्तर मुंबईतून किमान 38 नगरसेवक निवडून आणण्याचं आमचं लक्ष्य आहे, महायुतीला उत्तर मुंबईतून ऐतिहासिक जागा मिळतील, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दुसरीकडे मुंबईत पार पडलेल्या विजयी मेळाव्यानंतर मुंबई महापालिकेसाठी दोन्ही ठाकरे बंधू  मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे, यावर देखील गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील लोक जागरूक आहेत. मुंबईतील नागरिकांना, मुंबईतील मतदारांना त्यांचे भविष्य कुठे सुरक्षित आहे हे चांगलेच माहिती आहे. येथे मतदान केल्याने मुंबईचा विकास वेगाने होईल. केंद्रात एनडीएचे सरकार आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मुंबईतील लोकांना नक्कीच वाटेल की आपण दुहेरी इंजिनला तिहेरी इंजिनमध्ये रुपांतरीत करावे, आणि चांगल्या लोकांना नगरसेवक म्हणून निवडून आणावे. महायुतीचा महापौर महानगरपालिकेत निश्चितच बसेल, असं गोयल यांनी म्हटलं आहे.

 निलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया 

दरम्यान दुसरीकडे मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,  लोकांच्या मनावर कृतीचा फरक पडतो, हे काम देवेंद्र फडणवीस , एकनाथ शिंदे आणि अजित पवार करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी जे जे काही करता येईल ते करत आहे. सभागृहात सगळ्या आमदारांना नियमावली ठरवून दिली आहे,  जे काही शब्दांचा वापर करतात ते पटलावरुन आम्ही काढून टाकतो, बाहेर काय होतं त्याकडे आम्ही लक्ष देत नाहीत, असं गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.