AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, ‘स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही…’

पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्राजक्ता माळी हिचं समर्थन केलं आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी फार काही भाष्य केलेलं नाही. पंकजा यांनी नेमकं काय ट्विट केलं आहे याची माहिती आपण जाणून घेऊयात.

अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, 'स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही...'
अखेर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, 'स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही...'
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 29, 2024 | 8:02 PM
Share

बीडचे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर भाजप नेत्या तथा पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया समोर आलेली नाही. भाजप नेते सुरेश धस यांनी बीडमधील आक्रोश मोर्चात पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट का घेतली नाही? म्हणत प्रश्न उपस्थित केला होता. सुरेश धस यांनी अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करत असताना इव्हेंट मॅनेजमेंटचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांची नावे घेतली होती. याआधी करुणा शर्मा यांनी एका व्हिडीओत प्राजक्ताचं नाव घेतल्यामुळे तिला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल केलं जात होतं. यानंतर सुरेश धस यांनी प्राजक्ताचं नाव घेतल्यानंतर तिने पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. तसेच तिने राज्य महिला आयोगातही सुरेश धस यांच्याविरोधात तक्रार केली. यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्राजक्ता माळी हिचं समर्थन केलं आहे. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पंकजा मुंडे यांनी फार काही भाष्य केलेलं नाही.

पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

“‘शक्ती’ शिवाय कुठल्याही नकारात्मक ऊर्जेचा संहार होऊ शकला नाही. त्रिदेवही थकले की शक्तीचे आवाहन लागायचे. त्रिदेव कोणालाही वरदान द्यायचे आणि शक्ती संहार करायची. ‘दुर्दैवी घटना’ हे कलयुगातील स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी काहीही करणाऱ्यांसाठी खाद्य आहे. भावना कुठे आहेत? चिमुकल्यांचे बलात्कार, पाशवी अत्याचार आणि निघृण हत्या या थांबवणे शक्य आहे ना. पण कायद्याने, नियमाने! ते राहिले बाजूला नुसती चिखलफेक”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

“दुर्दैवाने soft targetआहे स्त्री आणि तिचे सत्व. काल पाहवलं नाही, पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे? तरी एका शक्तीची दुसऱ्या शक्तीला आपसूक साथ मात्र राहावी. Be strong n make us proud you all women”, अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी मांडली आहे.

Follow Us
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड
काहीही झालं तरी बापाला वाचवायचंय... प्रसिद्ध अभिनेत्याची तडफड, रुग्णालयावर गंभीर आरोप; 'सैराट'शी कनेक्शन काय?
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातड
राजकारणातील हालचालींना वेग! पवार-शिंदे भेटीनंतर आता सुनेत्रा पवार तातडीने वर्षा निवासस्थानी, काय घडतंय?
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ऐकावं ते नवलंच! रेल्वेचा AC कोच बनला हनिमून सूट; व्हिडिओ व्हायरल
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात
ती समजून घेण्याची गोष्ट... एकनाथ शिंदेच्या दालनातील पवरांच्या बैठकीबात जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत
थेट विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह! पवार-शिंदे भेटीवर बोलताना संजय राऊत हे काय बोलून गेले?
भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण; पाणीपुरवठ्याच्या वादाचं..
Raigad | पाणीपुरवठ्याच्या वादाचं हिंसक रूप!; भाजप नगरसेवकाकडून मुख्याधिकाऱ्यालाच मारहाण
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका,
ही एका प्रकारे आणीबाणीच”; संजय राऊतांची थेट मुख्यमंत्र्यांवर टीका, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही..
मोशी इमारत दुर्घटनेत मोठी अपडेट; 9 जणांची सुटका; ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती
मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड...
Hingoli | मध्यरात्री मराठवाडा हादरला! हिंगोलीत 4.4 रिश्टरचा भूकंप; तर नांदेड, परभणी, लातूरमध्येही....
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही...
5 दिवसांनंतर विरार लोकल धावली... पण स्टेशन गाठण्यासाठी अजूनही पाण्यातूनच प्रवास!