Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चर्चा होते तो मुख्यमंत्री होतोच असं नाही, पण काही…, ‘ काय म्हणाले विनोद तावडे

राज्यात मुख्यमंत्री पदाचे एक दावेदार मानले जाणारे परंतू केंद्रात गेलेल्या भाजपा नेते विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठे भाष्य केले आहे.

'चर्चा होते तो मुख्यमंत्री होतोच असं नाही, पण काही..., ' काय म्हणाले विनोद तावडे
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 2:16 PM

येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकांसाठी मतदान होत आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार की महाआघाडीचे सरकार येणार यावर चर्चा सुरु आहे. अलिकडे आलेल्या सर्वेमध्ये महायुतीचे सरकार येणार असे आकडे दाखविलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातून केंद्रात रमलेले भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी टीव्ही 9 मराठीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा महायुतीला बहुमत मिळणार असे म्हटले आहे. त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येणार की नाही यावर देखील भाष्य केले आहे.

भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले की भाजपमध्ये ज्या गोष्टीची चर्चा असते ते शंभर टक्के होतेच असे नाहीच. राजस्थानमध्ये पाहा, भजनलाल मुख्यमंत्री झाले. त्यांचं नाव चर्चेच नव्हतं. मोहन यादव मध्यप्रदेशात. इतर राज्यातही असंच आहे. चर्चा होते ते मुख्यमंत्री होतातच असं नाही. पण काही अपवादही असतात असेही तावडे यावेळी म्हणाले.

आपल्याला आता राष्ट्रीय स्तरावर काम करताना आनंद मिळतोय. मी २० वर्ष आमदार होतो. पाच वर्ष ९ खात्याचा मंत्री होतो. अशी नऊ खाती की आधीच्या सरकारमध्ये ९ जण सांभाळत होते. नंतर परत आठ जण सांभाळत होती. अशी नऊ खाती मी एकत्रपणे सांभाळली आहेत. आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते त्याचा आनंद आहे. दिल्लीत राहावं राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करावं वाटतं. ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र असे पुन्हा एकदा विनोद तावडे यांनी ठामपणे सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री कोण ? हे निवडणुकीनंतर…

भाजप ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढत आहे. मात्र, महायुतीचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहे. मुख्यमंत्री कोण काय हे निवडणुकीनंतर ठरवलं जाईल असेही विनोद तावडे यांनी सांगितले. फडणवीस, शिंदे आणि अजितदादा यांचे पुढे काय करायचं त्यांच्यावर कोणती जबाबदारी द्यायची हे केंद्रीय नेतृत्व ठरतील असेही तावडे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना विनोद तावडे म्हणाले की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा निवडणुकीनंतर करू असं पक्षाने ठरवलं आहे. संख्याबळावर मुख्यमंत्री ठरणार नाही. निवडणुकीनंतर बसून ठरवू. ज्याचे आमदार जास्त तो होईल असेही तावडे यांनी सांगितले. बिहारमध्ये आम्ही नितीश कुमार केले. आमचे आमदार जास्त पण नितीश कुमार मुख्यमंत्री झाले. पण त्या त्या वेळच्या राजकीय परिस्थितीवर लक्षात घेऊन करावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताचं पाहून निर्णय घ्यावा लागेल असेही तावडे यांनी सांगितले.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....