AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संजय राऊत बिनकामी माणूस, 10-20 जणांवर टीका केल्याशिवाय झोपत नाहीत’

धनगर आरक्षणासाठी आज सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देण्यात येणार आहे. "धनगर समाजाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत" असं गोपीचंद पडळकर म्हणाले. धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत हे सरकारने लिहून दिलं आहे असं त्यांनी सांगितलं.

'संजय राऊत बिनकामी माणूस, 10-20 जणांवर टीका केल्याशिवाय झोपत नाहीत'
Sanjay Raut
| Updated on: Nov 21, 2023 | 10:45 AM
Share

मुंबई (निवृत्ती बाबार) : “गेल्या 50 दिवसांपासून धनगर आरक्षणासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होतो, मोठा संघर्ष समाजाचा सुरू आहे. राज्यभर आमचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत, सरकारने आमच्याकडे 50 दिवसांची वेळ मागितली होती, बाहेरच्या राज्यांमध्ये त्यांच्या अधिकारांमध्ये जीआर काढले आहेत तसे महाराष्ट्र सरकारने जीआर काढावा अशी आमची मागणी होती” असं आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. “50 दिवसात कमिटी स्थापन करू आणि त्यावर निर्णय घेऊ. पण असं काही झालं नाही. त्यामुळे आम्ही आज सर्व जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आणि तहसीलदार कार्यालयामध्ये निवेदन देणार आहोत” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. त्यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत मोकळा माणूस आहे. बिनकामी माणूस आहे. त्यांचा तो स्वभाव आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहावीस जणांवर टीका केल्याशिवाय ते झोपत नाहीत. लोक त्यांना अजिबात सिरीयस घेत नाहीत, त्यांनी ठाकरे घराण्याचं वाटोळ केलं” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

“सर्व ठिकाणी लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन देणार आहोत. सरकारला आठवण करून देणार आहोत की, 50 दिवसांची मुदत संपली आहे तात्काळ कार्यवाही करा. धनगर समाजाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहेत. लोक आस लावून बसले आहेत, योग्य तो निर्णय त्यांनी घ्यावा” असं गोपीचंद पडळकर म्हणाले. “सुप्रिया सुळे यांचा या आरक्षणाशी संबंध नाही, अडीच वर्षाच्या काळात सुप्रिया सुळे यांच्या वडिलांचे नेतृत्वाखाली सरकार होतं तेव्हा त्यांनी काय केलं?” असा सवाल पडळकरांनी विचारला. “एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आमची सातत्याने केस चालू झाली, हे सरकार आल्यानंतर दोन इफिडिव्हिट दिली आहेत. आमचा ठाम विश्वास आहे की आम्हाला आरक्षण मिळेल” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘आमच्या भावनांचा अंत बघू नका’

“धनगड राज्यात अस्तित्वात नाहीत हे सरकारने लिहून दिलं आहे. विश्वास आहे की, आम्हाला न्याय मिळेल. आमचे चहुबाजूने प्रयत्न सुरू आहेत. सरकारने जीआर काढावा असे देखील आमचं म्हणणं आहे” असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं. “आज तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. आम्ही एवढेच सांगतोय की आमच्या भावनांचा अंत बघू नका तुम्ही तात्काळ निर्णय घ्या निर्णय नाही घेतला, तर आम्ही नागपूर अधिवेशनावेळी मोठ्या मोर्चाचं आयोजन करू” असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

‘मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही’

“गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वेगळे आरक्षण दिलं होतं, ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये कारण त्यांची संख्या मोठी आहे. गरीब मराठा समाजाला आरक्षण तात्काळ द्यावे, मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया जोरदार सुरू आहे, त्या आरक्षणाला आमचा विरोध नाही” असं गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.