AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हे उचित नाही’, अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

परभणी येथील वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्याने त्यांची हत्या झाली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. तर भाजपने या आरोपांना खोडून काढले आहे. अशोक चव्हाण यांनी राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.

'हे उचित नाही', अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांना सुनावलं, पाहा नेमकं काय म्हणाले?
अशोक चव्हाण आणि राहुल गांधी
| Updated on: Dec 24, 2024 | 5:58 PM
Share

परभणीत हिंसाचारानंतर पोलीस कोठडीत 35 वर्षीय वकील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या झालेल्या मृत्यूवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. या घटनेवरुन पोलिसांवर गंभीर आरोप केला जातोय. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना इतकी मारहाण केली की त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणीत जावून भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सोमनाथ सूर्यवंशी हे दलित असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या या आरोपांना भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. भाजप खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली का हे चौकशीनंतर स्पष्ट होईल. पण कोणी व्यक्ती एखाद्या समाजाचा आहे म्हणून त्याची हत्या मुद्दामून करण्यात आली असा निष्कर्ष चौकशी पूर्वी काढणे हे उचित नाही”, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दलित असल्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यावर अशोक चव्हाण यांनी टीका केली.

अशोक चव्हाण यांची नाना पटोलेंवर खोटक टीका

“राहुल गांधी यांचा परभणी दौरा हा राजकीय होता आणि राजकीय दौऱ्याच्या माध्यतून त्यांनी राजकारण करण्याच्या उद्देशाने त्यांनी हे स्टेटमेंट दिले आहे. त्यात सत्यता नाही”, असं अशोक चव्हाण म्हणाले. “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय बोलले मला माहिती नाही, पण साकोलीच्या जनतेने त्यांची लायकी काय हे दाखवली आहे”, अशी खोचक टीका देखील खासदार अशोक चव्हाण यांनी केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनीदेखील परभणीत जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. शरद पवार यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेऊन नेमकं काय काय घडलं होतं? याची माहिती जाणून घेतलं. यावेळी शरद पवारांनी सूर्यवंशी कुटुंबाला आरोपींवर कठोर कारवाई होईल, याची ग्वाही दिली.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.