AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे

औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे
| Updated on: Jan 08, 2021 | 8:15 PM
Share

सातारा : औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय. बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचाही निर्णय घेतला असता, असं मत उदयनराजे भोसले यांनी केलंय. लोकशाहीत जनता राजे आहेत. त्यामुळे याबाबत जनताच निर्णय घेईल, असंही त्यांनी नमूद केलं (BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue).

उदयनराजे भोसले म्हणाले, “ही लोकशाही आहे. आपण पाहतो बॉम्बेचं मुंबई झालं. तसं लोकं निर्णय घेतील. याबाबत मला काय वाटतं यापेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा. राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता.”

भरपूर फिरा, लोकांची कामं करा, पण लोकांना फिरवू नका, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उदयनराजे भोसले यांनी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोले लगावले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरत आहेत हे चांगलं आहे. ते लोकांमध्ये फिरतायत, फिरलं पाहिजे. लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी फिरावं, पण लोकांना फिरवू नये,” असा उपरोधक टोला उदयनराजेंनी लगावला.

“कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो”

उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी खास त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, “कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो. माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे.”

हेही वाचा :

भरपूर फिरा, लोकांची कामे करा, पण लोकांनाच फिरवू नका; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

व्हिडीओ पाहा :

BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue

Follow Us
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.