AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे

औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय.

बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचा निर्णय घेतला असता : उदयनराजे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jan 08, 2021 | 8:15 PM
Share

सातारा : औरंगाबादचं नामांतर प्रकरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील यावर भाष्य केलंय. बॉम्बेचं मुंबई झालं, राजेशाही असती तर औरंगाबादचाही निर्णय घेतला असता, असं मत उदयनराजे भोसले यांनी केलंय. लोकशाहीत जनता राजे आहेत. त्यामुळे याबाबत जनताच निर्णय घेईल, असंही त्यांनी नमूद केलं (BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue).

उदयनराजे भोसले म्हणाले, “ही लोकशाही आहे. आपण पाहतो बॉम्बेचं मुंबई झालं. तसं लोकं निर्णय घेतील. याबाबत मला काय वाटतं यापेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा. राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता.”

भरपूर फिरा, लोकांची कामं करा, पण लोकांना फिरवू नका, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना टोला

उदयनराजे भोसले यांनी सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही टोले लगावले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फिरत आहेत हे चांगलं आहे. ते लोकांमध्ये फिरतायत, फिरलं पाहिजे. लोकांमध्ये मिसळलं पाहिजे. ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी फिरावं, पण लोकांना फिरवू नये,” असा उपरोधक टोला उदयनराजेंनी लगावला.

“कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो”

उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी खास त्यांच्या स्टाईलने उत्तर दिलं. ते म्हणाले, “कुणीही मला मंत्री करू शकत नाही, मीच मंत्रिमंडळ निवडतो. माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझं कॅबिनेट आहे.”

हेही वाचा :

भरपूर फिरा, लोकांची कामे करा, पण लोकांनाच फिरवू नका; उदयनराजेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही, उदयनराजेंचं भुजबळांना उत्तर

बंदूक तुमच्या हातात होती, त्यावेळेस तुम्ही काय करत होता; उदयनराजे भोसलेंचा सवाल

व्हिडीओ पाहा :

BJP MP Udayanraje Bhosale comment on rename of Aurangabad issue

Follow Us
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल