
राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौरपदांचं आरक्षण निश्चित करण्यासाठी मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महानगरपालिकामधे महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल. वाचा सविस्तर..
कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाचे 11 नगरसेवक विजयी झाले असून यापैकी चार नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. सात जणांचा गट स्थापित करत काल सर्वच नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र कल्याण डोंबिवलीतून मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर कल्याण मुंबई ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ठाकरे गट आपली भूमिका मांडणार आहे. पत्रकार परिषदेसाठी डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष तात्या माने, कल्याण पूर्वेचे जिल्हाप्रमुख शरद पाटील आणि पश्चिमेचे जिल्हाप्रमुख कल्पेश भोईर उपस्थित राहणार आहेत.
अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदमध्ये भाजप आणि एमआयएमची युती झाली आहे. समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमने एकमेकांना साथ दिली आहे. तर एमआयएमच्या 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपासोबत आहे. अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएमसोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिंदे गटाला मनसेकडून मिळालेल्या पाठिंब्यानंतर राजकीय समीकरणे बदलताना दिसत असतानाच, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची एक फेसबुक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
नंदू परब यांनी केलेल्या या फेसबुक पोस्टमध्ये एक योद्धा धारातिर्थी पडलेला दिसत असून, त्याच्या पाठीत अनेक बाण रोवलेले असल्याचे चित्र आहे. या चित्रासोबत लिहिलेला मचकूरही सूचक असून, त्यातून थेट कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या जनतेने याचा संबंध भाजपशी लावू नये,असा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धुळे महानगरपालिकेत ५० जागांसह भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवले असले, तरी आता विरोधी पक्षनेते पद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १० जागा जिंकणाऱ्या एमआयएमने (MIM) दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून या पदावर दावा ठोकला आहे. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी आमदार फारुक शहा यांनी हे पद राष्ट्रवादीलाच मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे ८ आणि शिवसेनेचे ५ असे एकूण १३ नगरसेवक सोबत असल्याने आमचे संख्याबळ जास्त आहे, असा युक्तिवाद शहा यांनी केला आहे. यामुळे महापालिकेत आता एमआयएम विरुद्ध राष्ट्रवादी असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे.
जळगावच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि नगरसेवक सुनील महाजन यांच्या कारला मालेगावजवळ भीषण अपघात झाला. नाशिक येथे भाजपची संघटनात्मक बैठक आटोपून जळगावकडे परतत असताना हा अपघात घडला. समोरील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे महाजन यांची कार त्यावर जाऊन आदळली. या धडकेत कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे. मात्र, कारमधील सर्वांनी सीट बेल्ट लावलेले असल्याने आणि चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. जयश्री महाजन, सुनील महाजन आणि इतर तिघे जण या अपघातातून बालंबाल बचावले असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.
मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर आज भल्या पहाटे एक टॅम्पो उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या अपघातामुळे मुलुंड ते कांजूरमार्ग दरम्यान येणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गावर सुमारे ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सकाळी कामावर निघणाऱ्या चाकरमान्यांना या कोंडीचा मोठा फटका बसला आहे. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त टँपो बाजूला सारून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे.
मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकून भाजप मोठा पक्ष ठरला असला, तरी महापौर पदासाठी शिवसेनेने (शिंदे गट) आक्रमक पवित्रा घेतला आहे. २३ जानेवारीपासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती वर्ष सुरू होत आहे, याचेच औचित्य साधून मुंबईचा महापौर शिवसेनेचाच व्हावा, अशी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. शिवसेनेने ‘अडीच-अडीच वर्षे’ महापौर पद वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू असून, आता भाजप शिवसेनेची ही मागणी मान्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील हडपसर परिसरात राजकीय वादातून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेना उपसंघटक दीपक कुलाळ यांच्यावर राष्ट्रवादीचे पदाधिकारी उल्हास तुपे यांनी दगडाने हल्ला केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्यात कुलाळ जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हडपसर पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून, जखमी कुलाळ यांचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात जानेवारी महिना संपण्यापूर्वीच पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. अनेक गावांमधील विहिरींची पाणीपातळी खालावल्याने उभ्या पिकांना पाणी देताना शेतकऱ्यांची मोठी ओढाताण होत आहे. पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी तुषार सिंचनाचा आधार घेत आहेत, मात्र तरीही पाणी वेळेवर मिळत नसल्याने कांद्याची रोपे जळू लागली असून शेतात मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पिके वाचवण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याच्या आवर्तनाचे पाणी तातडीने वितरिकांमध्ये सोडण्यात यावे, अशी आर्त हाक आता येवल्यातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिली आहे.
बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील कारेगव्हाण परिसरात दोन पोलीस कॉन्स्टेबलने रात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत ऑनलाईन बेटिंगचे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत ४ आरोपींकडून ११ मोबाईल, २ लॅपटॉप आणि करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार आढळून आले. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास प्रशासनाला १६ तास लागले आणि गुन्हा दाखल होताच अवघ्या काही मिनिटांत आरोपींना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. पोलिसांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असला तरी, तांत्रिक कारणास्तव आरोपींना न्यायालयात हजर करता येत नसल्याचे समर्थन दिले आहे. या प्रकरणातील पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
शनिवारवाड्याबाहेर रांगोळी घालत दिल्ली दरवाजाला फुलाची सजावट करण्यात आली आहे.थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे शनिवारवाड्याचा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आलाय. मराठी साम्राज्याचा सुवर्णकाळ पाहिलेल्या शनिवारवाड्याचा आज २९४ वा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा करण्यात येतोय.
पुण्यातील हडपसरमध्ये शिवसेना (शिंदे ) गटाच्या उपसंघटक दीपक कुलाळ याच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने हल्ला केल्याचा आरोप… राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उल्हास तुपे यांनी दीपक कुल्लाळ यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप…दीपक कुलाळ यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असून, त्यांचं जबाब घेतल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिलीय.
मुंबई महापालिकेत सर्वाधिक ८९ जागा जिंकलेल्या भाजपाने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे.मात्र २१ नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे.
मुलूंडपासून कांजूरमार्ग या येणारी वाहतूक बाधीत. भल्या पहाटे अपघात झाल्याने वाहतूक कोंडींचा चाकरमान्यांना फटका. ट्रॅफिक विभागाकडून क्रेन मागवून टॅंपो हटवण्याचे काम सुरू
शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची. संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्यांकडून केला जात असला तरी भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव
आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.
राज्यातील 29 महापालिकांच्या महापाैर पदाची आज सोडत असून आरक्षण जाहीर होईल. त्यापूर्वी राजकीय घडामोडींना वेग येत असून मनसे नेते संदीप देशपांडे यांची दहा वाजता पत्रकार परिषद आहे.
मालेगावजवळ जळगावातील भाजपच्या माजी महापौर जयश्री महाजन आणि नगरसेवक सुनील महाजन या दाम्पत्याच्या कारचा अपघात. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे महाजन दाम्पत्यासह कारमधील सर्वजण बालबाल बचावले. मात्र कारच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला. समोरील वाहनाने अचानक गतिरोधकामुळे ब्रेक दाबला. त्यामुळे मागून येणारी महाजन यांची कार थेट समोरील वाहनावर आदळल्याने हा अपघात झाला.
शिवसेनेने जागा वाटपात जास्त जागा घेतल्यामुळे भाजपच्या नगरसेवकांची संख्या कमी झाली असली असा दावा भाजपच्या पदाधिकार्यांकडून केला जात आहे. पण भाजपच्या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या 10 उमेदवारांच्या पदरी पराभव आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीवरून हाती आली आहे.
मुंबई महापालिकेत सर्वाधिक 89 जागा जिंकलेल्या भाजपने महापौर पदावर दावा कायम ठेवला आहे. मात्र 29 नगरसेवकांच्या जोरावर शिवसेना महापौर पदासाठी आग्रही असल्याचे चित्र आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ही मागणी मान्य करावी, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त केली जात आहे. या मुद्द्यावर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे सरचिटणीस, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात दिल्लीत चर्चा सुरू आहे.
नागपूर महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 102 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापौर हा नागपुरात भाजपचाच होणार. मात्र तो कोण्या प्रवर्गातून होणार आणि त्यासाठी दावेदार कोण? याकडे आता संपूर्ण नागपूरचे लक्ष लागले आहे. महापौर पदाची सोडत कशी काढली जाते, त्यानुसार महापौर पदाचे आरक्षण निघणार आहे. महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असून ते महापौर बिनविरोध होण्यास पुरेसे आहे. परंतु महापौर पदासाठी काँग्रेसकडून उमेदवार देण्याची शक्यता सुद्धा नाकरता येत नाहीय.
महिलांसाठी 50 टक्के आरक्षण लागू. आरक्षण चक्राकार पद्धतीने काढले जाणार. 2011 च्या जनगणनेच्या आधारे आरक्षण निश्चित. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक महापालिकांचा समावेश. पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी महापालिकांसाठी आरक्षण जाहीर. सोडतीनंतर कोणती महापालिका आरक्षित आहे की खुली, हे स्पष्ट होणार.
राज्यातील महापालिकांसाठी महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर होणार. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात सोडत प्रक्रिया. सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळातील परिषद सभागृहात सोडत निघणार. महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीसाठी आरक्षण निश्चित. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी प्रथम आरक्षण जाहीर होणार. त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्ग (OBC) आरक्षणासाठी सोडत निघणार.
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मागच्या आठवड्यात निवडणुका झाल्या. निकालानंतर आज महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या महापौरपदाच्या सोडतीकडे लागलं आहे.
मुंबईसह 29 महानगरपालिकांसाठी मागच्या आठवड्यात निवडणुका होऊन निकाल लागला. आज राज्यातील सर्व महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत निघणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. महापौर पदाचं आरक्षण कुठल्याही प्रवर्गासाठी जाहीर होऊ शकते. त्या प्रवर्गाचा निवडून आलेला नगरसेवक त्या पक्षाकडे असणं गरजेच आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत 102 जागांवर विजय मिळविला आहे. त्यामुळे महापौर हा नागपुरात भाजपचाच होणार. मात्र तो कोणत्या प्रवर्गातून होणार आणि त्यासाठी दावेदार कोण याकडे आता संपूर्ण नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे. पुणे महापौर पदासाठी सुद्धा आज आरक्षण निघणार आहे. पुणे महापालिकेचे महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित असेल हे आज स्पष्ट होणार आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आज 29 महापालिकांच्या महापौर पदाची सोडत निघणार आहे.