AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार

या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 05, 2023 | 11:58 AM
Share

बुलढाणा : जिल्ह्यातील निवाना येथील शेतकरी जयप्रकाश जाधव यांनी आपल्या 2 एकर शेतातील हरबरा काढून त्याची गंजी लावली होती. मात्र रात्रीच्या वेळी त्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाला. ही आग अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. मोठ्या मेहनतीनं त्यांनी दोन एकर जागेत हरभरा लावला होता. त्याची जोपासना केली. हरभरा काढून गंजी लावून ठेवली. मशीनमध्ये चुरून हा हरभरा ते विक्रीसाठी नेणार होते. पण, आग लागल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला.

यंदा हरभऱ्याला चांगला हमीभाव

सध्या बाजारात हरभरा साडेचार हजार प्रती क्विंटल या दरानं विकला जातो. हरभऱ्याला पाच हजार ३३५ रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यामुळं नोंदणी केंद्रावर अमरावती जिल्ह्यात रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. चार पैसे जास्त मिळतील, हा त्यामागचा हेतू होता. रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पिकाचं विक्रमी उत्पादन झालं. शेतकऱ्यांना याला फायदा होणार आहे. पण, जयप्रकाश यांच्याबाबतीत काही वेगळचं घडलं.

आगीत दोन एकरमधील हरभरा जळाला

यंदा २५ क्विंटल हरभरा झाल्याने सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन होणार म्हणून ते कालपर्यंत खूश होते. पण, काल अचानक हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. त्या आगीत सर्वकाही जळून खाक झाले. त्यामुळं जयप्रकाश जाधव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या सव्वा लाखाच्या उत्पन्नातून आपण कसं खर्च करणार, याचे स्वप्न त्यांनी रंगवले होते. पण, आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाल्याने त्यांचे स्वप्न अधुरेचं राहिले. इतर हरभरा उत्पादकांना उत्पन्न मिळाले. मात्र, आपण काय वाईट केलं होतं. आपलं नुकसान कुणी केलं, याचा विचार आता जयप्रकाश करत आहे. आग लावणाऱ्याला अटक करून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगीत हरभला जळाल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Follow Us
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?