AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार

या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे.

2 एकरावरील हरभऱ्याच्या गंजीला आग; जयप्रकाश यांच्या जीवनात अंधार
| Edited By: | Updated on: Mar 05, 2023 | 11:58 AM
Share

बुलढाणा : जिल्ह्यातील निवाना येथील शेतकरी जयप्रकाश जाधव यांनी आपल्या 2 एकर शेतातील हरबरा काढून त्याची गंजी लावली होती. मात्र रात्रीच्या वेळी त्या हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाला. ही आग अज्ञात व्यक्तीने आग लावली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या आगीत तब्बल 25 क्विंटलच्या जवळपास हरभरा जळून खाक झाला आहे. त्यामुळे जाधव या शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. मोठ्या मेहनतीनं त्यांनी दोन एकर जागेत हरभरा लावला होता. त्याची जोपासना केली. हरभरा काढून गंजी लावून ठेवली. मशीनमध्ये चुरून हा हरभरा ते विक्रीसाठी नेणार होते. पण, आग लागल्याने हातातोंडाशी आलेला घास गेला.

यंदा हरभऱ्याला चांगला हमीभाव

सध्या बाजारात हरभरा साडेचार हजार प्रती क्विंटल या दरानं विकला जातो. हरभऱ्याला पाच हजार ३३५ रुपये हमीभाव दिला जात आहे. त्यामुळं नोंदणी केंद्रावर अमरावती जिल्ह्यात रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. चार पैसे जास्त मिळतील, हा त्यामागचा हेतू होता. रब्बी हंगामात हरभऱ्याच्या पिकाचं विक्रमी उत्पादन झालं. शेतकऱ्यांना याला फायदा होणार आहे. पण, जयप्रकाश यांच्याबाबतीत काही वेगळचं घडलं.

आगीत दोन एकरमधील हरभरा जळाला

यंदा २५ क्विंटल हरभरा झाल्याने सव्वा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पादन होणार म्हणून ते कालपर्यंत खूश होते. पण, काल अचानक हरभऱ्याच्या गंजीला आग लागली. त्या आगीत सर्वकाही जळून खाक झाले. त्यामुळं जयप्रकाश जाधव कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. या सव्वा लाखाच्या उत्पन्नातून आपण कसं खर्च करणार, याचे स्वप्न त्यांनी रंगवले होते. पण, आगीत संपूर्ण हरभरा जळून खाक झाल्याने त्यांचे स्वप्न अधुरेचं राहिले. इतर हरभरा उत्पादकांना उत्पन्न मिळाले. मात्र, आपण काय वाईट केलं होतं. आपलं नुकसान कुणी केलं, याचा विचार आता जयप्रकाश करत आहे. आग लावणाऱ्याला अटक करून त्याच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. तसेच आगीत हरभला जळाल्याने नुकसानभरपाई देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.