AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं”;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल

सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल
| Updated on: Apr 15, 2023 | 5:28 PM
Share

बुलढाणा : मागील मार्च महिन्यात आणि आता या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडल्यामुळे शेतकऱ्याना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. सलग चार वेळा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागल्यामुळे सरकारतर्फे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार असल्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, या नुकसानीमध्ये जर कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.

त्यानंतर आता विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज विरोधी पक्षनेतेत अंबादास दानवे यांनी बुलढाणा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फक्त घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना हे सरकार फक्त नुकसान भरपाईटी आणि पॅकेज जाहीर करत असते मात्र तशी मदत काही मिळत नाही असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी या सरकारकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे अवकाळी आणि गारपीटीमुळे ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज होती. मात्र हे सरकार असंवेदनशील असल्याचे टीका त्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

त्यामुळेआता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजेच खामगाव तालुक्यातील चितोडा येथील शेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तर सरकार फक्त घोषणा करत असून त्यांना मदत मिळत नाही, त्यामुळे हे सरकार संवेदनाहिन असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

तर सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.