“सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं”;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल

सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

सरकार घोषणा करण्यात फक्त पुढं;नुकसानग्रस्तांच्या मदतीवरून विरोधकांचा सरकारवर हल्लबोल
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 5:28 PM

बुलढाणा : मागील मार्च महिन्यात आणि आता या महिन्यात शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाच्या तडाक्यात सापडल्यामुळे शेतकऱ्याना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. सलग चार वेळा शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागल्यामुळे सरकारतर्फे नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळणार असल्याची घोषणा केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली, या नुकसानीमध्ये जर कोणताही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही.

त्यानंतर आता विरोधकांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी करून नुकसान भरपाईवरून जोरदार हल्लाबोल केला आहे.

आज विरोधी पक्षनेतेत अंबादास दानवे यांनी बुलढाणा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवरून त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून फक्त घोषणा केली जाते मात्र प्रत्यक्ष मदत मिळत नाही अशा शब्दात विरोधी पक्षनेत्यांनी त्यांचा समाचार घेतला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करताना हे सरकार फक्त नुकसान भरपाईटी आणि पॅकेज जाहीर करत असते मात्र तशी मदत काही मिळत नाही असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही त्यांनी या सरकारकडे केली आहे. त्यांनी म्हटले आहे अवकाळी आणि गारपीटीमुळे ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे. त्याच वेळी शेतकऱ्यांना खरी मदतीची गरज होती. मात्र हे सरकार असंवेदनशील असल्याचे टीका त्यांनी केली आहे.

बुलढाणा जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.

त्यामुळेआता मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर म्हणजेच खामगाव तालुक्यातील चितोडा येथील शेतीची पाहणी करून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तर सरकार फक्त घोषणा करत असून त्यांना मदत मिळत नाही, त्यामुळे हे सरकार संवेदनाहिन असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

तर सरकार घोषणा करण्यात पुढे असून अद्यापही मदत मिळाली नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.

Non Stop LIVE Update
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.