AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुनी पेन्शन लागू केल्यास सरकारवर बोजा पडेल; यांनाही पेन्शनची गरज काय?, या नेत्याने केलेत सवाल

जुन्या पेन्शनच्या मागणी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. पण २००५ पूर्वी नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे. त्यापूर्वी असलेल्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे.

जुनी पेन्शन लागू केल्यास सरकारवर बोजा पडेल; यांनाही पेन्शनची गरज काय?, या नेत्याने केलेत सवाल
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Mar 17, 2023 | 12:27 PM
Share

बुलढाणा : जुन्या पेन्शनच्या मागणी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आजचा चौथा दिवस आहे. पण २००५ पूर्वी नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू आहे. त्यापूर्वी असलेल्यांना पेन्शनचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे हे कर्मचारी आक्रमक झालेत. लोकप्रतिनिधी पाच वर्षांसाठी निवडून येतात. त्यांनाही पेन्शन मिळते. ते दोन-तीन वेळा निवडून आल्यास त्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होते. लोकप्रतिनिधी कायदे तयार करतात. ते स्वतःच्या हिताचे. मग कर्मचाऱ्यांनी काय घोडं मारलं. असं म्हणत हे कर्मचारी संपावर गेलेत. यामुळे आरोग्यसेवा कोलमडलीय आहे. प्रश्न कुणाचेही असोत ते चर्चेतून समजून घेतले पाहिजे. त्यानंतर त्यावर योग्य तो तोडगा काढला पाहिजे, असं मतही या शेतकरी नेत्यानं व्यक्त केलं.

…तर बाकीचे लोकप्रतिनिधी पैसे जमा करतात

जुनी पेन्शन योजना लागू केल्याने सरकारवर बोजा पडेल हा एक भाग आहे. परंतु हा नैतिकतेचा ही प्रश्न आहे. पेन्शन द्यायची असेल तर मग सरसकट सर्वांना द्या. नाहीतर कुणालाही देऊ नका. राजकारणातील दोन पाच टक्के प्रामाणिक लोकप्रतिनिधी सोडले तर बाकीचे लोकप्रतिनिधी कोट्यवधी रुपये जमा करतात. त्यांना पेन्शनची गरज नाही, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलंय.

…तर कुणालाच देऊ नका

रविकांत तुपकर म्हणाले, अनेक लोकप्रतिनिधी असं म्हणतात की आमचं बजेट कमी आहे. राजकारणात दोन-चार प्रामाणिक लोकप्रतिनिधी सोडले तर बाकीच्यांना पेन्शनची गरज काय. लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कोट्यवधी रुपये जमा करतात. न्याय द्यायचा आहे, तर सर्वांना सारखा द्या. पेन्शन द्यायची आहे तर सर्वांना द्या. नसेल द्याची तर कुणालाच देऊ नका.

९० टक्के आमदार कोट्यधीश

राजकीय पक्षांचे ९० टक्के आमदार करोडपती आहेत. त्यांना पेन्शनची गरज काय. कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले आमदार हे पेन्शन घेतात. आमदार, खासदार यांना प्रत्येक टर्मची पेन्शन वेगळी मिळते. मग, लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय आणि सामान्यांना वेगळा न्याय असं का. देशात जो-जो आपले प्रश्न घेऊन पुढं येतो. त्याचं म्हणणं समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या मागण्यांवर चर्चा करणे आवश्यक आहे, असं मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलं.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.