AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त पाहुणी म्हणून आली, बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेहच सापडला

सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त चिखली येथे आली होती. पण, त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी चिमुकलीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही सापडली नाही.

सहा वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त पाहुणी म्हणून आली, बेपत्ता झालेल्या चिमुकलीचा मृतदेहच सापडला
| Updated on: May 14, 2023 | 6:00 PM
Share

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, बुलढाणा : उन्हाळ्याच्या शाळांना सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चेकंपनी लग्नसमारंभानिमित्त गावाला जात आहेत. कुणी ग्रामीण भागात तर कुणी मामाच्या गावाला जात आहेत. सात वर्षांची चिमुकली लग्नानिमित्त चिखली येथे आली होती. पण, त्यानंतर ती बेपत्ता झाली. त्यामुळे घरच्यांना चिंता वाटू लागली. त्यांनी चिमुकलीला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, ती काही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी चिमुकलीचा मृतदेह सापडला. त्यामुळे तिचा खून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या छोट्याशा मुलीने कुणाचे वाईट केले होते. या चिमुकलीला एवढी मोठी शिक्षा देणाऱ्या नराधमांविरोधात आंदोलनाच्या तयारीत चिखलीकर आहेत.

मृतदेह सापडल्याने खळबळ

जिल्ह्यातील रोहडा येथील तपोवन देवी परिसरात एका सहा वर्षीय चिमुकलीचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे चिखली तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय. या घटनेचा निषेध म्हणून उद्या चिखली शहरात बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

चिमुकलीचा शोध घेणे सुरू

सहा वर्षीय राधिका विलास इंगळे असं या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती बाळापूर येथील मूळनिवासी आहे. इंगळे कुटुंबीय परवाला आपल्या परिवारासह एका लग्नानिमित्त चिखलीला आले होते. सकाळी 11 वाजल्यापासून ही चिमुकली हरवली होती. गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात या चिमुकलीचा शोध घेणे सुरू होते.

मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी

अखेर काल सायंकाळी चिमुकलीचा मृतदेह तपोवन देवी मंदिर परिसरात आढळून आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. सहा वर्षीय राधिकाचा खून कोणी केला ? याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र या घटनेचा निषेध म्हणून आणि मारेकऱ्यांना तत्काळ अटक व्हावी, यासाठी उद्या चिखली शहरात बंद पुकारला आहे.

चिमुकलीचा खून करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आवाहन पोलिसांसमोर आहे. आता पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी किती वेळ लावतात. यावर नागरिकांचा संताप अवलंबून राहणार आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.