AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नसोहळ्यात माणुसकीची भिंत, पुसदमधील आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. नवरीच्या वडिलांनी माणुसकीची भिंत जोपासली. त्यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा परिसरात होत आहे.

लग्नसोहळ्यात माणुसकीची भिंत, पुसदमधील आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक
| Updated on: May 14, 2023 | 5:25 PM
Share

विवेक गावंडे, प्रतिनिधी, यवतमाळ : लग्न म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतो. डिजेचा कानठड्या बसवणारा आवाज. घोडा किंवा गाडीवर बसलेला नवरदेव. लाऊडसस्पीकरवरील गाणी, नातेवाईकांचा गोतावळा. पण, या सर्व पारंपरिक विवाह सोहळ्याला काही जण फाटा देतात. असाच एक विवाह सोहळा यवतमाळातील पुसद येथे पार पडला. या विवाह सोहळ्याची चर्चा सर्वत्र आहे. नवरीच्या वडिलांनी माणुसकीची भिंत जोपासली. त्यामुळे त्यांच्या या लग्नसोहळ्याची चर्चा परिसरात होत आहे.

निराधारांना अन्नदान आणि वस्त्रदान

एरवी लग्न म्हटले की, आपण डिजे,फटाके आणि इतर वायफळ खर्च पाहत आलेलो आहे. पण पुसद येथील श्रीरामपूर येथे राहत असलेले अनंता चतुर यांनी आपली मुलगी आकांशा हिच्या लग्नात माणुसकीची जाण ठेवली. आहेर पद्धतीला फाटा देऊन पुसदमधील रोडवरील बेघर मनोरुग्ण यांना अन्नदान आणि भोजनदान केले. अत्यंत गरजूंना नवीन कपडे आणि जेवन देऊन समाजासमोर एक नवीन आदर्श ठेवला.

लग्न सोहळ्याचे सर्वत्र कौतुक

विशेष अनंता चतुर हे गाडगेबाबांच्या कार्यावर प्रेरित झालेत. माणुसकीच्या भिंतीचे ते सदस्य आहेत. माणुसकीची भिंत येथे ते मागील चार वर्षापासून आपली सेवा देत आहेत. दररोज अन्नदान सेवेकरिता न विसरता ते हजर असतात. पुसदमध्ये सध्या या आगळ्यावेगळ्या लग्न सोहळ्यांचे कौतुक केले जात आहे. समाजाला अशा विचार करणाऱ्या समाजभान असणाऱ्या माणसांची गरज आहे.

समाजाला दिशा दाखवणारा उपक्रम

या लग्नप्रसंगी या दाम्पत्याने आदर्श ठेवला. मनोरुग्णांना, निराधारांना एकत्र केले. समाजातील काही चालीरीतींना फाटा दिला. निराधारांना अन्नदान, वस्त्रदान केले. अशा आदर्श पद्धतीने विवाह केला. या विवाह सोहळ्यातून आदर्श घ्यावा. समाजाला दिशा दाखवण्याचे काम करावे.

अनंता चतुर यांच्या या सामाजिक उपक्रमामुळे ते चांगलेच चर्चेत आले. अन्न आणि वस्त्रदानाची खरी गरज असते ती निराधारांना. हेच अनंता यांनी हेरलं. खर समाधान कुठं मिळेल, तर ते माणुसकीस. ही माणुसकीची भिंत त्यांनी जोपासली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.