AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nandurbar : सत्ताधारी विरोधात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो, सत्तेतून गेलोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही, बावनकुळेंचा टोला

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना धारेवर धरलs आहे. पितृपक्ष आणि मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Nandurbar : सत्ताधारी विरोधात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो, सत्तेतून गेलोय हे त्यांच्या लक्षातच येत नाही, बावनकुळेंचा टोला
महाविकास आघाडीवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Sep 13, 2022 | 5:26 PM
Share

नंदुरबार : सर्व मंत्र्यांनी आपापल्या मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला आहे. मात्र विरोधकांना हे दिसत नाही. सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी (Opposition) पक्षात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो. त्यांना आपण सत्तेतून गेलो आहोत, हे लक्षातच येत नाही, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह विविध नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. मंत्र्यांनी आपल्या खात्याची सुत्रे हाती घेतली नसल्याची टीका सातत्याने करण्यात येत आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, की मी स्वतः पाहिले आहे, की सर्व मंत्री कामाला लागले आहेत. तसेच आधीच्या सरकारपेक्षा या सरकारची कामाची गती चांगली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

‘हे विचारण्याचा त्यांना अधिकार आहे का?’

अजित पवारांवर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की त्यांनी आधी सांगावे, की पहिले 18 महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात का आला नाही? त्यामुळे त्यांना हे विचारण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात, असा टोला अजित पवारांना लगावला आहे. आधीचे तीन चाकी रिक्षा आणि आताचे बुलेट ट्रेनचे सरकार यात फरक असल्याचा टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

‘आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात’

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांना धारेवर धरले आहे. पितृपक्ष आणि मंत्रीपदाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीने त्यांच्या सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 महिने मंत्रालयात का आले नाही? उद्धव ठाकरे यांना फक्त फेसबुकवरच पाहत होतो, असा सवाल बावनकुळेंनी केला. तसेच मविआने आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात, असाही सल्ला त्यांनी नंदुरबार येथे दिला.

काय म्हणाले होते अजित पवार?

पितृपक्ष असल्याने बर्‍याच मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारलेला नाही. बरेच मंत्री मंत्रालयाच्या कार्यालयात गेले नाहीत, असे अजित पवार म्हणाले होते. याबाबत बातम्यांची कात्रणेही त्यांनी दाखवली होती. जग कुठे चालले आहे आणि आपण काय करत आहोत, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. 

Follow Us
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला
सांगली जिल्हा परिषदेत मविआची सत्ता, अध्यक्षपदी पवार गटाची महिला.
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?
उद्या गुढीपाडवा... पण नववर्ष कधी सुरू होणार?.
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?
ठाकरे युतीनंतर पहिलाच गुढीपाडवा मेळावा, राज ठाकरे काय बोलणार?.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गॅस तुटवड्यानंतर आणखी एक मोठं संकट.
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस
मुंबईला गँगवॉरकडे जाऊ देणार नाही - CM फडणवीस.
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू
दिल्ली मेट्रो स्टेशनजवळील सदनगर परिसरात भीषण आग; 7 जणांचा मृत्यू.
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद
बलिदान मास पूर्ण करत, शंभू भक्तांकडून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवाद.
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप
अजित पवारांच्या अपघातावरून रोहित पवार यांचा थेट सरकारवर आरोप.
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ....
दिल्ली दौऱ्यात शिंदेचं मोदींसोबत खलबतं; केंद्रीय मंत्रिमंडळ.....
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?
हे सर्व भाजपचे अंगवस्त्र, संजय राऊत यांची कुणावर टीका; काय दिला इशारा?.