AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivjayanti | जय भवानी, जय शिवाजी… घोषणांनी दुमदुणार आग्रा येथील किल्ला, औरंगजेबाच्या तावडीतून राजेंची सुटका, काय आहे किल्ल्याचं महत्त्व?

यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर (Agra Red Fort) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दिवान ए आम सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे.

Shivjayanti | जय भवानी, जय शिवाजी... घोषणांनी दुमदुणार आग्रा येथील किल्ला, औरंगजेबाच्या तावडीतून राजेंची सुटका, काय आहे किल्ल्याचं महत्त्व?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 17, 2023 | 9:45 AM
Share

Shivaji Maharaj Jayanti : छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती येत्या रविवारी १९ फेब्रुवारी साजरी केली जाणार आहे. महाराष्ट्रातील शहरा-शहरात शिवजयंतीचा (Shivjayanti) उत्साह पहायला मिळणार आहे. या वर्षीच्या शिवजयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा आग्रा येथील लाल किल्ल्यावर (Agra Red Fort) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दिवान ए आम सभागृहात शिवजयंती साजरी होणार आहे.  या सोहळ्याला आधी पुरातत्त्व खात्याने परवानगी नाकारली होती. मात्र सामाजिक संस्थांनी याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. राज्य सरकार सहआयोजक असल्यास आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मिळेल, असा निर्णय कोर्टाने दिला. त्यानंतर आता शिवजयंतीचा हा कार्यक्रम धडाक्यात साजरा होणार आहे.

ऐतिहासिक महत्त्व काय?

मुघल आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात आग्रा येथील लाल किल्ल्याचं विशेष महत्त्व आहे. औरंगजेबासारख्या कपटी आणि दगेखोर बादशहानं शिवरायांना कैद करण्याचा डाव याच किल्ल्यावर रचला.

औरंगजेबानं १९६६ मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रित केलं होतं. दगेखोर औरंगजेबाचं आमंत्रण स्वीकारावं की नाही, या द्विधेत महाराज होते. अखेर पुत्र संभाजीराजे आणि शिवाजी महाराज हे दोघं १२ मे १९६६ रोजी आग्रा येथे पोहोचले. मात्र कपटी औरंगजेबानं या दोघांना इथेच बंदी बनवून ठेवलं. अवघा महाराष्ट्र संकटात सापडला होता.

तीन महिने बंदीत राहिल्यानंतर अखेर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि काही निष्ठावान सैनिकांसोबत आग्रा येथून मिठाईच्या पेटाऱ्यात बसून निघाले. हा दिवस होता १७ ऑगस्ट १९६६.

जागतिक वारसा

आग्रा येथील हा किल्ला जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध ताजमहल या किल्ल्यापासून अडीच किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे काही इतिहासकार, या किल्ल्याचं वर्णन करताना चार भिंतींनी घेलली प्रासाद महाल नगरी असं करतात. मुघल सम्राट बाबर, हुमायुं, अकबर, जहांगीर, शाहजहां आणि औरंगजेब येथेच राहत होते. इथूनच ते संपूर्ण भारतावर शासन करत होते.

ताजमहालचे विहंगम दृश्य

आग्रा किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरून ताजमहालचं विहंगम दृश्य पाहता येतं. तु सुमारे ३ किमी परिसरात हा किल्ला विस्तारलेला आहे. तर किल्ल्याच्या भोवती ७० फूट उंच भिंती आहेत. राजस्थानातून आणलेल्या वाळूच्या दगडापासून किल्ल्याच्या भिंती उभारल्या आहेत. किल्ल्याला मुख्य चार दरवाजे आहेत. त्यापैकी एक खिजारी गेट म्हणून ओळखला जातो.तो नदीत उघडत असे. या घाटांमध्ये बादशाहला स्नान करायला आवडायचं, असं सांगण्यात येतं.

Follow Us
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?