इंदोरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाला मोठी मांदियाळी, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण, आज तब्बल..
इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आज इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाहसोहळा आहे. अत्यंत आलिशान पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडणार आहे. राज्यातील मोठे नेतेही या विवाहसोहळ्यास उपस्थिती लावणार आहेत.

इंदोरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. आज इंदोरीकर महाराज यांची मुलगी ज्ञानेश्वरी हिचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. जय्यत तयारी या विवाहसोहळ्याची सुरू आहे. काल हळदीचा कार्यक्रम पार पडला. आज सायंकाळी हा विवाहसोहळा आहे. 100 एकरमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे हा विवाहसोहळा पार पडेल. 100 एकर परिसरात भव्य तयारी झाली आहे. लाखोंच्या उपस्थितीची शक्यता आहे. या शाही विवाहसोहळ्याची पत्रिकाही व्हायरल झाली. गगनगिरी महाराज सप्ताहाच्या ध्वजारोहणाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. किर्तनपुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडणार पडेल. राज्यातील बडे नेतेही या विवाहसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. इंदोरीकर महाराज मुलीचा शाही विवाह करत असल्याने त्यांच्यावर एकच टीकेची झोड उडालीये. लोक त्यांच्यावर टीका करत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या शाही विवाहाचे आमंत्रण देण्यात आले. दोघेही या विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राजकीय नेते, संत-महंत यांची मोठ्या प्रमाणात हजेरी विवाहसोहळ्यात असेल. भव्य साखरपुड्यानंतर सोशल मीडियावर इंदोरीकर महाराज चर्चेत आले होते. त्यानंतर लग्नापेक्षाही मोठी पैशांची उधळपट्टी महाराजांकडून केली जात आहे.
उपदेश एक, आचरण दुसरं? म्हणत नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा इंदोरीकर महाराजांना धारेवर धरले. साखरपुड्यापेक्षा लग्न अधिक भव्य करण्याचे महाराजांनी अगोदरच जाहीर केले होते. आता या शाही विवाहसोहळ्यामुळे महाराजांना पुन्हा एका लोक खडेबोल सुनावताना दिसत आहेत. लग्न साधी करा असे कायमच किर्तनात इंदोरीकर महाराज सांगताना दिसतात.
इंदोरीकर महाराज यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात याचा विसर पडल्याचे बघायला मिळत आहे. प्रत्येक गोष्टीचे शाही नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आले. डेकोरेशन, पाहुण्यांची खास व्यवस्था आणि खास जेवणाचे नियोजन या विवाहसोहळ्यात करण्यात आले. मात्र, इंदोरीकर महाराज लेकीच्या लग्नात पैशांची ज्या पद्धतीने उधळण करत आहेत. ते लोकांनी पचणी पडत नाहीये. मुलीच्या साखरपुड्यानंतरही इंदोरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.