AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, किती जणांचा मृत्यू? किती जखमी? फडणवीसांनी दिली माहिती

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येत असून, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, किती जणांचा मृत्यू? किती जखमी? फडणवीसांनी दिली माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2025 | 5:51 PM
Share

पुण्यामध्ये आज मोठी दुर्घटना घडली आहे, इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळला , या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे, तर काही पर्यटकांचा मृत्यू देखील झाला आहे. ही घटना मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात घडली आहे. आज रविवार असल्यानं या परिसरात पर्यटकांची संख्या देखील जास्त होती, याच दरम्यान आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा पूल कोसळला. घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे, काही पर्यटकांचा वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या घटनेतील मृतांना  श्रद्धांजली अर्पण केली आहे.

नेमकं काय म्हटलं फडणवीस यांनी? 

‘पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे. 6 जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.’ असं ट्विट फडणवीस यांनी केलं आहे.

नेमकं काय घडलं? 

पुण्यातील इंद्रायणी नदीवर असलेला पूल कोसळल्याची घटना घडली आहे. मावळमध्ये असलेल्या कुंड मळ्यात ही घटना घडली आहे. या घटनेत 20 ते 25 भाविक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह हाती लागले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून, काही पर्यटकांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत सहा जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

Follow Us
मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर केस
Nasrapur case | मृत्युदंड की जन्मठेप... वकिलांनी काय सांगितलं? पुण्यातील नसरापूर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर
आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू...
Shivsena | आधी फुटले, आता म्हणतात, उद्धव ठाकरेंचं परभणीत स्वागत करू; खासदार संजय जाधवांचं मोठं विधान; नेमकं काय म्हणाले?
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!