AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. त्यावरून आता फडणीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

...त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला!
| Updated on: Dec 24, 2024 | 3:37 PM
Share

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसकडून हाच मुद्दा पकडत भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. काँग्रेस खासदारांकडून आंदोलन देखील करण्यात आलं. दरम्यान यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. काँग्रेसकडूनच आरक्षणाला विरोध करण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं वक्तव्य अर्धवट ट्विट करत काँग्रेसने जनतेचा आणि संसदेचा वेळ वाया घालवला. आता देखील ते लोकांमध्ये खोटं पसरवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे यासाठी आधी काँग्रेसने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने कसा संविधानाचा अपमान केला, त्यांचा कसा आरक्षणाला विरोध होता हे पुराव्यासह जनतेसमोर आणलं आहे, त्यामुळेच काँग्रेसकडून हे सर्व करण्यात येत आहे.

काँग्रेसकडून आरक्षणाला विरोध होत आला आहे, हे जेव्हा मोदीजींनी संपूर्ण जगासमोर आणलं, तेव्हा काँग्रेस पार्टी अशाप्रकारचं नाटक आता करत आहे. खरं म्हणजे याच काँग्रेस पार्टीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ दिलं नाही. लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिथे शिकले ते घर लिलावात निघालं होतं, काँग्रेसकडे अनेक संघटनांनी मागणी केली हे घर लिलावात जाऊ देऊ नका, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. जेव्हा आमचं सरकार आलं तेव्हा ते घर आम्ही घेतलं.

महू असो, दिक्षाभूमी असो, अलीपूर रोड असो प्रत्येक ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जपण्याचं काम हे भाजप सरकारने केलं. काँग्रेसला फक्त त्यांचं नाव वापराचं आहे. आणि त्यांचं नाव वापरून राजकारण करायचं आहे. मात्र त्यांना कुठलाही सन्मान कधीही काँग्रेसने दिलेला नाही. भारतरत्न देखील काँग्रेसने दिलेला नाही. हे देखील मी या ठिकाणी स्पष्ट सांगू इच्छितो. काँग्रेस सरकारनं इंदू मिलमधील स्मारकासाठी जमीन देखील दिली नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.