AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश

महाआवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज (15 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या.

महाआवास अभियानांतर्गत 3 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना घरकुलाच्या चाव्या, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश
UDDHAV THACKERAY
| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 8:36 PM
Share

मुंबई : महाआवास अभियानांतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घराची चावी देऊन ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम आज (15 जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या दिल्या. तर याचवेळी ई-गृहप्रवेशांतर्गत राज्यभरातील एकूण 3 लाख 22 हजार 929 लाभार्थ्यांना त्या-त्या जिल्ह्यात चाव्यांचे वितरण करण्यात आले. (CM Uddhav Thackeray hand over key of home to more than 3 lakh Gharkul beneficiaries under the Maha Awas Abhiyan scheme)

या कार्यक्रमास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार राहूल शेवाळे, खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते. विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एका महिन्यात पूर्ण होणार

“मागील दीड वर्षापासून राज्य कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आपण नागरिकांना घरात राहा, सुरक्षित राहा असे आवाहन करत होतो. परंतू घर नसलेल्यांनी घरात कसे राहायचे ? भूमिहीनांनी घरात सुरक्षित कसे राहायचे हा प्रश्न होता.  ज्याचे उत्तर आज ग्रामविकास विभागाने दिले आहे. 100 दिवसात 8 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट ग्रामविकास विभागाने निश्चित केले होते. त्यातील 3 लाख 22 हजारांहून अधिक घरकुले बांधून पूर्ण झाली. ज्याच्या चाव्या आज आपण लाभार्थ्यांना दिल्या आहेत. तर उर्वरित 4 लाख 67 हजार 953  घरांचे काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे,”असे मुख्यमंत्री म्हणाले.

15 लाख लोकांच्या डोक्यावर महाआवासमुळे छत

तसेच पुढे बोलताना , “शासन अनेक योजना राबवते. त्यात अनेक योजना केवळ जाहीर होतात. पण ग्रामविकास विभागाने जलदगतीने घरं बांधून गोरगरीबांना त्यांचे हक्काचे घर मिळवून दिले आहे. त्याबद्दल मी यंत्रणेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करतो. 3 लाख 22 हजार 929 घरकुलात राहणाऱ्या सदस्यांची संख्या लक्षात घेतली तर आज 15 लाख लोकांच्या डोक्यावर महाआवास अभियानातील घरकुलांनी छत उपलब्ध करून दिले आहे. त्यांना सुरक्षित केले आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम

अभियानात गवंडी प्रशिक्षणाचा अभिनव उपक्रम राबवल्याबद्दल विभागाचे कौतूक करून मुख्यमंत्री म्हणाले की, घरांच्या बांधणीसाठी लागणारे साहित्य महिला बचत गटांच्या “घरकुल मार्ट”मधून उपलब्ध करून देऊन त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही ग्रामविकास विभागाने केले आहे. हे सर्वसामान्य जतनेचे स्वप्नं पूर्ण करणारे शासन आहे. असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

अभियानाची वैशिष्ट्ये

>>> मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

>>> अभियानामुळे सर्वसामान्यांसाठी सर्व सोयींनी युक्त 3 लाख 22 हजार 929 घरकुले पूर्ण झाली.  आज या सर्व लाभार्थ्यांना त्या त्या जिल्ह्यात चावीचे वितरण करण्यात आले.

>>>  4 लाख 67 हजार 953 घरकुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

>>>  घरासाठी आर्थिक सहाय्य देण्याबरोबर भूमिहीन लाभार्थ्यांना विविध योजनेतून घरकुल उभारणीसाठी शासनाने जागा उपलब्ध करुन दिल्या. या लाभार्थ्यांची संख्या 50 हजार 112 आहे.

>>> वाळूसहीत इतर बांधकाम साहित्याची उपलब्धता केल्याने अभियान कालावधित घरांची उभारणी वेगाने होऊ शकली.

>>>  महिला बचत गटाच्या सहकार्याने लाभार्थ्यांना वाजवी दरात बांधकाम साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी 612 “घरकुल मार्ट” उभारण्यात आले.

>>>  गवंडी प्रशिक्षाणवर भर दिला. आतापर्यंत 8 हजार 815 गवंड्यांचे प्रशिक्षण पूर्ण. तर 13 हजार 295 गवड्यांचे प्रशिक्षण प्रगतीपथावर.

>>>  घरकुल लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अभियानात प्रयत्न करण्यात आले.  यासाठी विविध विभागांच्या योजनांचा कृतीसंगम करण्यात आले.

>>> जागेची अडचण असलेल्या ठिकाणी 1286 बहुमजली इमारती बांधण्यात आल्या.

इतर बातम्या :

Video : संभाजीराजेंच्या बैठकीत काही काळ गोंधळ, राजेंच्या आवाहनानंतर कार्यकर्ते शांत

लॉकअप तोडून कुख्यात दरोडेखोर पळाला, पोलिसांना चकवा देत महाराष्ट्रभर हिंडला, अखेर मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या

आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करा, शाळांच्या फी वसुलीच्या मुद्द्यावरुन उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

(CM Uddhav Thackeray hand over key of home to more than 3 lakh Gharkul beneficiaries under the Maha Awas Abhiyan scheme)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.