AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर कोण मुख्यमंत्री होईल? नाना पटोले स्पष्टच म्हणाले….

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 'टीव्ही9 सत्ता संमेलन' कार्यक्रमात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. "काँग्रेसला संधी मिळाली तर हायकमांड मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील", असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार बनलं तर कोण मुख्यमंत्री होईल? नाना पटोले स्पष्टच म्हणाले....
नाना पटोले
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Oct 28, 2024 | 6:59 PM
Share

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणूक सुरु आहे. या निवडणुकीत कोण जिंकेल आणि कुणाचा पराभव होईल ते 23 नोव्हेंबरच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्याआधी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न नाना पटोले यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. यासह नाना पटोले यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली. ते ‘टीव्ही9 सत्ता संमेलन’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी जागावाटपाचा प्रश्नावरही प्रतिक्रिया दिली. “आता सर्व सेट झालं आहे. हे चालत राहतं. आमच्याकडेच नाही. भाजपमध्येही सुरूच होतं. उद्या शेवटची तारीख आहे. उद्या दुपारपर्यंत अलायन्स क्लिअर होईल”, असं नाना पटोले म्हणाले.

“काँग्रेसबाबत अफवा भाजप पसरवत असते. आम्ही भाजपला सीरिअसली घेत नाही. जनतेलाही माहीत आहे. महाराष्ट्र वाचवायचं आमचं काम आहे. त्यामुळे शिवसेनेला विदर्भात जास्त जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज झाले असं म्हणणं चुकीचं आहे”, असं स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं. “राहुल गांधींना वाटायचं की सर्व समाजाला नेतृत्व दिलं पाहिजे. सर्वांना संधी दिली पाहिजे. राहुल गांधी यांनी ही भूमिका ठेवली होती. पण आघाडीच्या राजकारणात मेरिटवरच जागा वाटप करावं लागतं. त्यामुळे काही समाजाला संधी देता आली नाही. पण सत्तेत आल्यावर आम्ही या समाजाला मुख्य प्रवाहात आणणार आहोत”, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

“नाना कधी घाबरत नाही. अधिकाराची गोष्ट ठाकरे गट ठेवतो. आमच्या अधिकारावर आम्ही बोलत असतो. लोकशाहीत हा अधिकार आहे. संजय राऊत आमचे मित्र आहे. आव्हान वगैरे नाही. उद्यापर्यंत सर्व गोष्टी नीट होतील. अखिलेश यादव यांच्याशीही चर्चा सुरू आहे. उद्यापर्यंत तेही मुख्य प्रवाहात येतील. आमच्या जागा वाटप झाल्यावर त्यांना जागा देण्याचं ठरलं होतं. पण आम्हालाच वेळ लागला. त्यामुळे छोटे पक्ष नाराज झाले. पण उद्यापर्यंत सर्व क्लिअर होईल”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल?

“काँग्रेसकडून महाविकास आघाडीच हा आमचा चेहरा राहील असं आम्ही स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत आम्ही काही लपून ठेवलं नाही. आम्ही तिन्ही मिळून लढणार आहोत. आमची लढाई खुर्चीसाठी नाही. आमची लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे. बहुमतात सरकार आणणं हा आमचा पहिला मुद्दा आहे. महायुतीत जे काही चाललंय ते पाहा. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केलं आता तुमची संधी गेली, असं अमित शाह बोलले. युतीत काय चाललंय पाहा. पण आमच्यामध्ये सर्व क्लिअॅरिटी आहे”, असं म्हणत नाना पटोले यांनी महायुतीला टोला लगावला.

“काँग्रेसला संधी मिळाली तर हायकमांड मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. मी जे काही आहे ते तोंडावर बोलतो. जे आहे त्याचा रिझल्ट देतो. महाराष्ट्रात भ्रष्टाचारी सत्ता आहे, महाराष्ट्र विकला जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग विकले जात आहेत. खुर्ची ही माझी चिंता नाही. महाराष्ट्र वाचवणं ही माझी चिंता आहे. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेचा महाराष्ट्र आहे. आम्ही राज्यात कधी तणाव पाहिला नाही. पण भाजपची सत्ता आल्यानंतर जातीय तणाव निर्माण झाला. महाराष्ट्र शांतता प्रिय राज्य आहे. भाजपने महाराष्ट्राला बरबाद करण्याचं काम केलं आहे. आम्ही ते कधी होऊ देणार नाही”, असं नाना पटोले म्हणाले.

“महाराष्ट्र वाचवणं हे आमचं काम आहे. आम्ही पक्ष वाढवला. ज्या खुर्चीवर आम्ही बसलो त्या खुर्चीत जीव ओतणं आमचं काम आहे. खुर्ची जनतेची असते. लोकांचं काम करणं हे आमचं काम आहे”, असं नाना पटोले म्हणाले. “लोकसभेची निवडणूक मोदींच्या चेहऱ्यावर लढण्यात आली होती. आता खरी सुरुवात झाली आहे. आता एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजितदादा यांची सुरुवात झाली आहे. तसेच भाजप संविधानाच्या विरोधात बोलत असते. भाजप लोकशाहीला धोका आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!