AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत मागणी, कॉंग्रेसचीही तीच भूमिका म्हणत अशोक चव्हाण यांचा कुणावर हल्लाबोल

बेळगाव सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्या मागणीला महाराष्ट्र कॉंग्रेस पाठिंबा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत मागणी, कॉंग्रेसचीही तीच भूमिका म्हणत अशोक चव्हाण यांचा कुणावर हल्लाबोल
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 26, 2022 | 4:06 PM
Share

नागपूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा प्रश्नाचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. यावरून राजकीय वातावरण तापलेलं असतांना मराठी भाषिकांनी कोल्हापूर येथे येऊन आंदोलन केले आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देत काही मागण्या केल्या आहेत. अशी सर्व परिस्थिती असतांना उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत एक मोठी मागणी केली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र हा सीमा वादाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात जाऊन ठेपला आहे. तिथे दोन्ही बाजूचे वकील आपआपली बाजू मांडत आहे. हा वाद कधी निकाली लागेल माहिती नाही पण दुसरीकडे कर्नाटक सरकारने हा मुद्दा अधिक आक्रमक पणे हाती घेतला आहे. बेळगाव येथील मराठी भाषिकांवर अत्याचार करणे, कानडी भाषेत शिक्षण, कानडी भाषेतच व्यवहार करणे आणि इतकंच काय बेळगावला उपराजधानी घोषित करून नाव बदलण्याचे काम कर्नाटक सरकार करत असतांना महाराष्ट्र सरकार शांत बसले आहे. त्यामुळे गृहमंत्री यांनी याबाबत दखल घेऊन बेळगाव हा केंद्रशासित भाग म्हणून जाहीर करून हा सीमा भागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

बेळगाव सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर हा भाग केंद्रशासित करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्या मागणीला महाराष्ट्र कॉंग्रेस पाठिंबा दिला आहे.

कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत हीच मागणी कॉंग्रेसची असल्याचे म्हंटले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, उद्धव ठाकरेंनी आज सभागृहात जो मुद्दा मांडला तो अतिशय योग्य होता, प्रश्न सोडवेपर्यंत तो प्रदेश केंद्रशासित प्रदेश करा, काँग्रेसचीसुद्धा तीच भूमिका आहे असं म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे अशोक चव्हाणांनी केलं स्पष्ट केलं असून ठाकरेंच्या मागणीला कॉंग्रेसने साथ दिली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवीत असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर ठोस भूमिका घेत नाहीत अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Follow Us
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर