AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात

नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021)

नागपूर गडावर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला मोठं यश, आतापर्यंत 53 ग्रामपंचायती खिशात
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jan 18, 2021 | 4:07 PM
Share

नागपूर : नागपुरात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस सर्वात पुढे असल्याचं चित्र दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार नागपुरात काँग्रेसला 53 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. त्यामुळे नागपूर गडावरील वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आलं आहे. काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीला 21 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या निकालानुसार शिवसेनेला फक्त दोन ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे. तर भाजपला 29 ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).

90 जागा जिकंणार, काँग्रेसचा दावा

नागपुरात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी काँग्रेस 90 जागांवर विजयी होणार, असा दावा केला. त्यांच्या दावा कितपत खरा ठरतो हे पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी नागपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे (Congress win 53 seats in Nagpur Gram Panchayat Election 2021).

“काँग्रेस पक्षाची चांगली घोडदौड सुरु आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये एकतर्फी आणि एकहाती सत्ता काँग्रेस पक्षाने प्राप्त केली. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी बहुमताने विजयी झाले”, अशी प्रतिक्रिया राजेंद्र मुळक यांनी दिली.

“आता ग्रामपंचायतींचा निकाल आपण सगळ्यांनी पाहिला आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मिळाला आहे. कारण काँग्रेस नेत्याचे सर्व नेते, मंत्री ते कार्यकर्ते सर्वजण एकत्रित आले. सर्व एकत्रित आल्याने ही ताकद निर्माण झाली. भाजपला विजयापासून आम्ही थांबवलं. आम्ही जवळपास 90 टक्के जागांवर विजयी झालो आहोत”, असा दावा त्यांनी केला.

नागपुरात आतापर्यंत समोर आलेल्या मतमोजनीनुसार काँग्रेसने 53 ग्रामपंचायतींवर वर्चस्व राखण्यात विजय मिळवला आहे. तर 21 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. नागुरात भाजप 29 पंचायतींवर विजयी झाले. तर शिवसेनेचा 2 ग्रामपंचायतींमध्ये विजय झाला आहे.

संबंधित बामत्या :

Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा