AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gram Panchayat Election Results 2021: ‘मला धक्का देणारा अजून जन्मला नाही’, नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, अशा शब्दात नितेश राणे वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane Vaibhav Naik gram panchayat)

Gram Panchayat Election Results 2021: 'मला धक्का देणारा अजून जन्मला नाही', नाईकांनी डिवचल्यानंतर राणे कडाडले
VAIBHAV NAIK AND NITESH RANE
| Updated on: Jan 18, 2021 | 3:20 PM
Share

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिकंल्या आहेत. आम्ही शिवसेनेला धक्का दिल्ला आहे. यापूर्वी शिवसेनेकडे असलेल्या ग्रामपंचायती यावेळी भाजपने जिंकल्या आहेत. त्यामुळे राणेंना धक्का देणारा अजून कुणी जन्माला आलेला नाही, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे शिवेसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यावर कडाडले. (Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. शिवसेनेने राणेंना धक्का दिला आहे, असे विधान करत शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी नितेश राणे यांना डिवचले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी वरील प्रतिक्रिया दिली. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. “सिंधुदुर्गातील 70 पैकी 57 ग्रामपंचायती भाजपने जिंकल्या आहेत. आम्ही शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेकडे यापूर्वी असलेल्या तोडवली-बावशी, कुपवड़े, चिंदर, चुनवरे कोलगाव या ग्रामपंचायती आम्ही जिंकल्या आहेत. या निकालावरून राज्यातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे; हे स्पष्ट होते” असे नितेश राणे म्हणाले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीसुद्धा आमचीच

यावेळी बोलताना आगामी काळात कोकणात शिवसेनेचे अस्तित्व नाहीसे होईल, असा दावा नितेश राणे यांनी केला. “सिंधुदुर्गातील आजच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे वर्चस्व पाहता येथील जनता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट होते. आता पुढील काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच जिंकेल,” असे वक्तव्य राणे यांनी केले. तसेच, आगामी काळात विरोधक नष्ट होणार ही काळ्या दगडावरची रेघ असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

वैभव नाईक काय म्हणाले ?

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 60 टक्के ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आल्या आहेत, असा दावा केला. तसेच, पुढे बोलताना कणकवलीत नितेश राणेंच्या मतदारसंघात 3 ग्रामपंचायतींपैकी 2 ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्याचे सांगितले. त्यामुळे गेल्या 2 निवडणुकीत सातत्याने राणेंना धक्का दिला आहे. त्यामुळे राणे यांचं अस्तित्व संपलं असल्याचे नाईक म्हणाले. तसेच राणे यांनी शिवसेनेने धक्का दिला आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी केली.

संबंधित बामत्या :

Gram Panchayat Election Results 2021 : जाऊबाई जोरात, काट्याची लढत घरात, जाऊबाईंच्या लढतीत कोण जिंकलं?

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : अवघ्या चार मतांनी विजय, सासू-सूनेच्या लढतीत चाव्या कोणाकडे?

सरपंचपद गेल्यावेळी निम्मं-निम्मं वाटून घेतलं, आता सासूबाईंविरोधात सूनेचा शड्डू

(Nitesh Rane criticizes Vaibhav Naik on gram panchayat election)

Follow Us
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?
आरोपींना संरक्षण देणाऱ्या अश्विनी चैनानीच्या जामीन अर्जाचं काय झालं?.
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय
मोठी बातमी! 99.9% शुद्ध चांदीवर सरकारचा मोठा निर्णय.
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात
महिलेला नको तसे व्हिडीओ पाठवले अन् कार्यालयातच.... NCP अजित पवार गटात.
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा...
NEET पेपरफुटीचे धागेदोरे नांदेडपर्यंत! 5 लाखात विकत घेतला परीक्षेचा....
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?
मोठी बातमी! पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, मात्र कारण काय?.
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत
कोकण किनारपट्टीवर वादळी पावसाचा इशारा, शेतकरी चिंतेत.