AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! कारण काय?

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे.

औरंगाबाद महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता! कारण काय?
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 16, 2021 | 9:07 AM
Share

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतील महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन होणार आहे. पण आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचं काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रणच देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जात आहे.(Congress workers are not invited to Aditya Thackeray’s Aurangabad tour)

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटन समारंभापासून काँग्रेसला दूर ठेवण्यात आल्याची भावना काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आहे. कारण, काँग्रेसच्या एकाही पदाधिकाऱ्याला या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नाही. त्यामुळे काँग्रेस पदाधिकारी नाराज असून, पुन्हा एकदा औरंगाबादेत महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुनही वाद

औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. त्यात आता मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असल्यामुळे ती अधिकच प्रखरपणे आणि सातत्याने मांडली जात आहे. CMOच्या ट्विटर अकाऊंटवरुनही औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरुनही वातावरण चांगलंच पेटलं होतं. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेच्या भूमिकेला आणि औरंगाबादच्या नामांतराला विरोध केला आहे.

“राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही,” असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबादेत पुन्हा ‘बॅनरवॉर’

औरंगाबाद शहराचं नामकरण करण्याच्या मुद्द्यावरुन आधीच राजकारण तापलेलं असताना आता भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा बॅनरवॉर सुरु झालं आहे. शिवसेनेच्या सुपर संभाजीनगर या कॅम्पेनविरोधात भाजपने शहरात नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज (16 जानेवारी) औरंगबादच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात या सगळ्या घडामोडी घडत आहेत.

लव्ह औरंगाबाद बोर्डसमोर भाजपचे नमस्ते संभाजीनगर

औरंगाबाद शहराच्या नामकरणावरुन सध्या राजकारण तापलेलं आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी भाजपकडून होत आहे. तर महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने औरंगाबादच्या नामकरणाला जाहीर विरोध केलाय. काँग्रेसच्या या विरोधामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झालेली असताना भाजपने शहरातील लव्ह औरंगाबाद या बोर्डासमोर नमस्ते संभाजीनगरचे बॅनर लावले आहे. भाजपच्या याच बॅनरमुळे शहरातील राजकारण आता पुन्हा तापणार असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या : 

औरंगाबादच्या नामांतराची प्रत्यक्ष वेळ येताच सेनेची नेहमीच माघार; भाजपचा गंभीर आरोप

नामांतराबाबत चर्चेतून मार्ग काढू; ‘त्या’ ट्विटची शहानिशा करू: अजित पवार

Congress workers are not invited to Aditya Thackeray’s Aurangabad tour

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.