टेन्शन मिटलं! राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; नेमकी मागणी काय? तरतूद काय?
सारखरेचे दर अचानक सणासुदीच्या तोंडावर ७० रुपयांच्याही पुढे गेले आहेत. साखर अचानक कडू होण्यामागे सरकारचे इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण जबाबदार आहे का ? याची चर्चा सुरु असताना सहकार मंत्र्यांनी एक जालीम उपाय सुचवला आहे.

साखरेचे दर सध्या प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीत साखर सर्वसामान्यांना कडू झाली आहे. साखरेचे भाव ७० रुपयांवर पोहचले आहेत. सरकारने यामागे इथेनॉलचे धोरण जबाबदार नसून काळाबाजार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर आता सहकार मंत्र्यांनी याबाबत एक जालीम उपाय सांगितला आहे. साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकार एकीकडे साखर आयात करण्याचा विचार करत असताना सहकार मंत्र्यांनी चांगला उपाय सुचवला आहे. काय आहे हा उपाय पाहूयात…
वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. साखरेच्या वाढत्या दराव अंकुश मिळवण्यासाठी खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा अशी मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
खाण्यासाठीच्या साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या साखरेचा स्वतंत्र व्यावसायिक दर निश्चित करावा असे त्यांनी म्हटले आहे. बिस्किट, शीतपेयांसह इतर व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेचे दर वेगळे करावत असा हा प्रस्ताव आहे.
केंद्र सरकारकडून साखरेचे नियोजन
वाढत्या साखर दराच्या पार्श्वभूमीवर साखर आयातीबाबत केंद्र सरकारकडून साखरेचे नियोजन सुरू आहे. ऊसाची FRP आणि साखरेची MSP लिंक करण्याची मागणी देखील राज्य सरकारने केली आहे. FRP-MSP लिंक केल्यास ऊस उत्पादकांना अधिक भाव मिळेल आणि कारखानेही टिकतील असाही दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत साखरेचे दर प्रचंड वाढले आहेत. साखर देशभरात ६० ते ७० रुपये किलो झाली आहे. याआधी ३७ रुपये किलो दराने साखर उपलब्ध होती, अशीही पाटील यांनी म्हटले आहे.
