AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेन्शन मिटलं! राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; नेमकी मागणी काय? तरतूद काय?

सारखरेचे दर अचानक सणासुदीच्या तोंडावर ७० रुपयांच्याही पुढे गेले आहेत. साखर अचानक कडू होण्यामागे सरकारचे इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरण जबाबदार आहे का ? याची चर्चा सुरु असताना सहकार मंत्र्यांनी एक जालीम उपाय सुचवला आहे.

टेन्शन मिटलं! राज्यात साखर स्वस्त होणार? सरकारकडून केंद्राला महत्त्वाचा प्रस्ताव; नेमकी मागणी काय? तरतूद काय?
sugar price hike
| Updated on: Aug 23, 2026 | 5:00 PM
Share

साखरेचे दर सध्या प्रचंड वाढल्याने ऐन सणासुदीत साखर सर्वसामान्यांना कडू झाली आहे. साखरेचे भाव ७० रुपयांवर पोहचले आहेत. सरकारने यामागे इथेनॉलचे धोरण जबाबदार नसून काळाबाजार जबाबदार असल्याचे म्हटले आहे. तर आता सहकार मंत्र्यांनी याबाबत एक जालीम उपाय सांगितला आहे. साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकार एकीकडे साखर आयात करण्याचा विचार करत असताना सहकार मंत्र्यांनी चांगला उपाय सुचवला आहे. काय आहे हा उपाय पाहूयात…

वाढत्या साखर दरावर राज्य सरकारचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केंद्र सरकारला एक प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. साखरेच्या वाढत्या दराव अंकुश मिळवण्यासाठी खाण्याची आणि व्यावसायिक वापराची साखर वेगळी करा अशी मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.

खाण्यासाठीच्या साखरेचा स्वतंत्र कोटा ठेवून दर कमी ठेवण्याची मागणी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली आहे. तसेच व्यावसायिक वापराच्या साखरेचा स्वतंत्र व्यावसायिक दर निश्चित करावा असे त्यांनी म्हटले आहे. बिस्किट, शीतपेयांसह इतर व्यावसायिक वापरासाठीच्या साखरेचे दर वेगळे करावत असा हा प्रस्ताव आहे.

केंद्र सरकारकडून साखरेचे नियोजन

वाढत्या साखर दराच्या पार्श्वभूमीवर साखर आयातीबाबत केंद्र सरकारकडून साखरेचे नियोजन सुरू आहे. ऊसाची FRP आणि साखरेची MSP लिंक करण्याची मागणी देखील राज्य सरकारने केली आहे. FRP-MSP लिंक केल्यास ऊस उत्पादकांना अधिक भाव मिळेल आणि कारखानेही टिकतील असाही दावा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांत साखरेचे दर प्रचंड वाढले आहेत. साखर देशभरात ६० ते ७० रुपये किलो झाली आहे. याआधी ३७ रुपये किलो दराने साखर उपलब्ध होती, अशीही पाटील यांनी म्हटले आहे.

Follow Us
पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
Supriya Sule on Mahesh Landge :पहिला वार करायचा असेल तर माझ्यावर करा', लांडगेंना सुळेंचं थेट आव्हान
CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजार...
Devendra Fadnavis : CM फडणवीसांचा जेन-झींशी संवाद, क्रिकेटपटू तिलक वर्मासह 10 हजारांहून अधिक तरुणांची उपस्थिती
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! गणेशोत्सवासाठी कोकण...
भाजप आमदार संजय उपाध्याय यांची मोठी घोषणा! यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोफत बससेवा
राष्ट्रवादीचा अखेरचा पत्ता उलगडणार? कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक
राष्ट्रावादी अखेरचा पत्ता उलगडणार? एकाच आठवड्यात सलग बैठका, विलिनिकरणाबाबत....
आयकर विभागाची मोठी कारवाई! 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
आयकर विभागाची मोठी कारवाई! तब्बल 2143 कोटी... 16 नामांकित कंपन्यावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! पुण्यातील सुप्रिसिद्ध...
तुकाराम मुंढेंच्या भीतीने जुनी परंपरा मोडली! बऱ्याच काळापासूनची पुण्यातील प्रसिद्ध खाऊगल्ली बंद?
'सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार' गोरेंचं विधान
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार- जयकुमार गोरे
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला...
उत्पादन घट आणि वाहतूक खर्च वाढल्याने सुकामेवा महागला; बदाम, पिस्त्याच्या दरात ३०० रुपयांपर्यंत वाढ
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
भोरमध्ये पुणे ट्रान्समिशन थ्री प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा रास्ता रोको
मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची जालन्यात 130 गावांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा