AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India: देशात आजही कोरोना रुग्णसंख्येत उसळी, महाराष्ट्रातील रुग्णांचा सर्वाधिक 17.68% वाटा!

कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

Corona Cases in India: देशात आजही कोरोना रुग्णसंख्येत उसळी, महाराष्ट्रातील रुग्णांचा सर्वाधिक 17.68% वाटा!
Corona
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 12, 2022 | 11:15 AM
Share

नवी दिल्लीः भारतात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने (Corona Cases) मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. मागील 24 तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,94,720 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या (Omicron) एकूण रुग्णांची संख्या 4868 एवढी झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

रुग्णवाढीची टॉप 5 राज्ये कोणती?

मंगळवारी वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णवाढीपैकी 54.77% नवे रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळून आले. तर फक्त महाराष्ट्रात 17.68 टक्के रुग्णवाढ दिसून आली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी चिंताजनक बाब आहे. टॉप पाच राज्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे- महाराष्ट्र- 34 हजार 424 दिल्ली- 21,259 पश्चिम बंगाल- 21,098 तमिळनाडू- 15,379 कर्नाटक- 14,473

सर्वाधिक मृत्यू कुठे?

मागील 24 तासात देशात 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 4 लाख 84 हजार 378 एवढी झाली आहे. कालच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीतील असून दिल्लीतील 23 रुग्णांचा काल मृत्यू झाला तर महाराष्ट्रातही 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट आतापर्यंत 96.01% एवढा झाला आहे. मागील 24 तासात भारतात 60,405 एवढे रुग्ण बरे झाले.

देशात आतापर्यंतची आकडेवारी

एकूण रुग्णसंख्या- 3,60,70, 510 ओमिक्रॉनचे रुग्ण- 4,868 सक्रिय रुग्णसंख्या- 9,55,319 एकूण बरे झालेले रुग्ण- 3,46,30, 536 एकूण मृत्यू- 4,84,655 एकूण लसीकरण – 1,53,80,08,200

इतर बातम्या-

सासरी विवाहितेकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी हुंडाच, सुप्रीम कोर्टाचं मत, हायकोर्टाने सोडलेल्या पती-सासऱ्याला सश्रम कारावास

पंतप्रधानांच्या पंजाब दौरा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याची शक्यता, काँग्रेस सरकारची अडचण होणार?

Follow Us
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती
एकच खळबळ! माणूस मॅनहोलमध्ये कसा काय पडला? CCTV तून धक्कादायक माहिती समोर
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट
मुंबईत धुवाधार पावसात पुन्हा भयंकर घडलं! एक व्यक्ती थेट 20 ते 25 फुट खोल मॅनहोलमध्ये...
आता ऑपरेशन तुतारी! कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट
Sanjay Shirsat On Amol Kolhe | ऑपरेशन टायगरनंतर आता ऑपरेशन तुतारी! अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर शिरसाटांचा मोठा राजकीय स्फोट, म्हणाले...
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक
तीन ठिकाणी पंचनामे, मोबाईल, कपडे अन् सगळंच... पोलिसांचं पथक सियाच्या घरी पोहोचलं, पुढे काय घडलं?
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन
आधी मला तर स्कोअर करू दे, बाकीची टीम... बच्चू कडूंच्या दाव्यावर सचिन अहिर असं काय म्हणाले?
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा
सचिन आला तर त्याची टीमही येणारच...त्या बड्या नेत्याने केला मोठा खुलासा; ऑपरेशन टायगर पुन्हा अॅक्टिव्ह!
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना
धक्कादायक! नवजात मुलांच्या विक्रीचं रॅकेट, बड्या पक्षातील 2 नेत्यांना अटक
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण...
शरद पवार सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण... अमोल कोल्हेंचं मोठं विधान; चर्चांना मिळाला पूर्णविराम!