AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Curfew Violation | संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एक लाख पाच हजार गुन्हे, 20 हजार जणांना बेड्या

राज्यभरात कलम 188 नुसार एक लाख पाच हजार 532 गुन्हे दाखल झाले आहेत. 20 हजार 72 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)

Curfew Violation | संचारबंदी उल्लंघन प्रकरणी एक लाख पाच हजार गुन्हे, 20 हजार जणांना बेड्या
| Updated on: May 13, 2020 | 2:36 PM
Share

मुंबई : संचारबंदीच्या उल्लंघन प्रकरणी राज्यभरात आतापर्यंत एक लाख पाच हजार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तर 20 हजार नागरिकांना अटक करण्यात आली आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा आज 50 वा, तर महाराष्ट्रातील संचारबंदीचा 52 वा दिवस आहे. (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)

राज्यभरात कलम 188 नुसार एक लाख पाच हजार 532 गुन्हे दाखल झाले आहेत. 20 हजार 72 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 57 हजार 430 वाहनं जप्त करण्यात आली आहेत.

राज्यभरात पोलिसांनी ‘क्वारंटाइन’चा शिक्का असलेल्या 668 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवलं आहे. कालच्या दिवशी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलं आहे.

-अवैध वाहतूक करणाऱ्या 1296 वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत.

-आरोपींकडून या कालावधीत चार कोटी पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

-राज्यभरात डॉक्टर आणि इतर वैद्यकीय सेवकांवर हल्ल्याच्या 33 घटना घडल्या आहेत.

संचारबंदीच्या काळात पोलिसांवर हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. 214 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाल्याची नोंद आहे. या प्रकरणात 764 हल्लेखोर नागरिकांना अटक झाली आहे. कालच्या दिवसात 7 ठिकाणी पोलिसांवर हल्ला झाला होता. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात 83 पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड गंभीर जखमी झाले आहेत. (Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)

पोलीस कोरोनाच्या विळख्यात

महाराष्ट्र पोलीस दलातील एकूण 925 पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये 100 अधिकारी आणि 825 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 84 अधिकारी आणि 709 कर्मचारी अशा एकूण 793 पोलिसांना लक्षणं दिसून येत आहेत. तर 16 अधिकारी आणि 108 पोलीस कर्मचारी असे एकूण 124 जण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

(Curfew violation cases in Maharashtra during Lockdown)

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.