AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातली ‘लक्ष्मी’ गेली, नाव होतं बदाम, 30 वर्षांची संगत.. सांगलीत हळहळ!

आपल्या वागण्यातून परिसरात नेहमीच चर्चेत राहिलेल्या 'बदाम' च्या पायात लक्ष्मी आहे. तो आपला देवच आहे अशी मोठी श्रद्धा पाटील कुटुंबाची होती.

घरातली 'लक्ष्मी' गेली, नाव होतं बदाम, 30 वर्षांची संगत.. सांगलीत हळहळ!
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 08, 2023 | 11:05 AM
Share

शंकर देवकुळे, सांगली | सांगलीतल्या पाटील कुटुंबावर आज जणू काही आभाळ कोसळल्याची स्थिती आहे. ज्याच्या येण्यानं घरात समृद्धी नांदू लागली. ज्याच्यामुळे घरात प्रेम-जिव्हाळ्याचे नाते तयार झाले. ज्यानं 30 वर्षांपासून घरातल्या माणसांना बांधून ठेवलं, गावातल्या लोकांकडून आदर, मान, प्रेम मिळवलं, त्यानं अचानक एक्झिट घेतल्यानंत सांगलीतल्या कुटुंबावर आज शोककळा पसरली आहे. त्याचं नाव होतं बदाम. सांगलीतल्या येडेमच्छिंद्र येथील पाटील कुटुंबातला सगळ्यांचा लाडका बदाम बैल याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

माणसांसारखा एकट्याने प्रवास

बदाम बैलाची अख्ख्या सांगलीत एक वेगळीच ओळख होती. ती म्हणजे त्याला माणसासारखा एकट्याने प्रवास करता यायचा. घरापासून शेतापर्यंत आणि शेतापासून घरापर्यंत विनामालक दररोज ४ किलोमीटर प्रवास करायचा. जाताना व येताना डाव्या बाजुनेच प्रवास ठरलेला. तात्या शेतात जाताना बदामला सोडायचे व ते सायकल किंवा मोटारसायकल वरुन पुढे शेतात जायाचे. बदाम चिंचेचा मळा. येडेमच्छिंद्र गाव.कराड- तासगांव रस्ता पार करुन शेतात पोहचायचा. तिथले काम झाले की पुन्हा सायंकाळी पाच वाजता परतीचा प्रवास ठरलेला. पण या प्रवासात बदाम चा कोणालाच त्रास नाही. अनोळखी व्यक्ती बैल सुटलाय म्हणून ओरडायचे. पण तेथील लोकांनी बदाम ची कहाणी सांगितली की, ते ही अवाक् होऊन बदाम कडे बघतच उभे राहयाचे. गेले ३० वर्षे अविरत तात्यांच्या शेतात कष्ट करुन माणसाळलेल्या बदाम वर सर्वांचेच प्रेम होते.

Sangli 30 वर्षांची साथ सुटली

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र येथील चिंचेच्या मळ्यात राहणारे सुरेश पाटील (तात्या) यांच्या घरीच बदाम लहानाचा मोठा झाला. बदामने पाटील कुटुंबासह सर्वांनाच लळा लावला होता. चिंचेच्या मळ्यात राहणाऱ्या तात्यांची शेतजमीन कराड-तासगाव रस्त्यावरील भवानीनगर गावालगत आहे. आपल्या वागण्यातून परिसरात नेहमीच चर्चेत राहिलेल्या बदाम च्या पायात लक्ष्मी आहे. तो आपला देवच आहे अशी मोठी श्रद्धा पाटील कुटुंबाची होती. सर्व काही सुरळीत व आनंदात असताना वयोमानानुसार ‘बदाम’ बैलाने सर्वांना अलविदा करीत घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी ठरली. पाटील कुटुंबियांनी रितसर रक्षाविसर्जन करुन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परिसरातील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी उपस्थित राहून बदाम ला श्रद्धांजली अर्पण केली.

Sangli

दशक्रिया विधीही करणार

पाटील कुटुंबियांनी ‘बदाम’ ला आपला कुटुंब सदस्यच मानले होते. त्यामुळे त्याच्या निधनानंतर माती सावरण्याचा कार्यक्रम पार पडला. यानंतरचे दशक्रिया व उत्तरकार्यविधी रितसरच करणार असल्याचे सुरेश पाटील यांनी सांगितले.

Follow Us
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...