“…म्हणून लोकशाही संकटात”;शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून ‘या’ नेत्यानं राजकीय संकटांची शक्यता सांगितली

आगामी निवडणुकीविषयी बोलताना आमदार भास्करराव जाधव यांनी सांगितले की, आता नुकताच दोन एजन्सीनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये आता सांगण्यात आले आहे की, येत्या महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्व्हे देण्यात आला आहे.

...म्हणून लोकशाही संकटात;शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावरून 'या' नेत्यानं राजकीय संकटांची शक्यता सांगितली
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 8:54 PM

रत्नागिरीः शिवसेनेचा पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप विरुद्ध गटातील अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाविरोधात मत व्यक्त केले होते. तर ठाकरे गटाने या निर्णयावरून देशातील लोकशाही कशी धोक्यात आली आहे असं मत व्यक्त केले गेले. या निर्णयाविरोधात ठाकरे गटानेही आक्रमक भूमिका घेत देशातील लोकशाही संकटात आहे धोक्यात आहे असं मत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केल आहे.त्याच बरोबर सर्वश्रेष्ठ असणारे संविधान आणि घटनेलाही पायदळी तुडवले जात असल्याचे मतही व्यक्त केले जात आहे.

तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्हआणि पक्षाचे नाव गद्दारांना दिले जात असल्याचा घणाघात करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीमुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेली आहेत. त्यामुळे आगामी काळातही महाविकास आघाडीचा पॅटर्न राज्यभर राबविणार असल्याचे मत महाविकास आघाडीकडून बोलले जात आहे.सध्या महाविकास आघाडीने कसबा पोटनिवडणुकीत यश मिळवले असल्याने राजकीय गणितं चुकीची असल्याचेही सांगण्यात आले आहे.

कारण जो पुण्यातील जो कसबा पोटनिवडणुकीतील जो प्रभाग होता तेथील मतदार पारंपरिक असल्याचे बोलले जात होते. त्यातच कसबा मतदार संघात एका विशिष्ट समाजाची मतं असल्यामुळे भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असतानाही तेथून आनंद दवे यांनी उमेदवारी भरली होती.

मात्र त्यांना फक्त 450 मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता मतदारांचा कौल बदलत असून भाजपला चारीमुंड्यी चितपट करण्यात आल्याचे महाविकास आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

तर आगामी निवडणुकीविषयी बोलताना आमदार भास्करराव जाधव यांनी सांगितले की, आता नुकताच दोन एजन्सीनी सर्व्हे केला आहे. त्या सर्व्हेमध्ये आता सांगण्यात आले आहे की, येत्या महाविकास आघाडीकडून विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त आमदार निवडून येतील असा सर्व्हे देण्यात आला आहे.

तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुकीत 34 खासदार महाविकास आघाडीचे निवडून येतील असंही भास्करराव जाधव यांनी सांगितले.

चिन्ह आणि पक्षाचा निर्णया हा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला असला तरी आगामी निवडणुकीच्या काळात शिंदे गटाला जोरदार फटका बसणार असून त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Non Stop LIVE Update
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत
राज ठाकरेंचं 'धनुष्यबाणा'ला तर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच 'पंजा'ला मत.
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?
मुंबईसह राज्यात 13 जागांवर मतदान, मतदानाचा टक्का घसरला, कोणाला संधी?.
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल
12th Result : 12 वीचा निकाल 93.37 टक्के, दुपारी 1 वाजता असा बघा निकाल.
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप
भाजपचा नीच खेळ, ठाकरे भडकले अन् मुंबईतील मतदानावर भाजपसह आयोगावर आरोप.