AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक’, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल आयोग आणि अनिल देशमुख यांच्याबाबत नवा गौप्यस्फोट केला आहे. चांदिवाल आयोगाने देशमुखांना क्लीन चीट दिलेली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. अहवालातून उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांबद्दल आणि महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर फडणवीसांनी टीका केली आहे.

'चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक', देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख
| Updated on: Nov 13, 2024 | 6:17 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत नवे गौप्यस्फोट केले आहेत. एकीकडे अनिल देशमुख यांनी चांदिवाल आयोगाच्या अहवालात आपल्या विरोधात कुणाताही पुरावा सापडला नसल्याचं म्हटलं आहे. पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी चांदिवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी घोटाळ्यांचे आरोप झाले होते. अनिल देशमुख महाविकास आघाडीचं सरकार असताना मुंबईतील मोठमोठ्या बार आणि पबचालकांकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये घ्यायचे, असा आरोप तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. परमबीर यांनी त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून याबाबतचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच 11 महिन्यांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहावं लागलं होतं. याच प्रकरणी चांदिवाल आयोगाच्या अहवालावरुन आता राजकारण तापताना दिसत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे गंभीर आरोप

“चांदीवाल आयोगाचा अहवाल अत्यंत धक्कादायक आहे. त्यांनी अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीनचीट दिली नसल्याचं स्पष्टपणे म्हटले आहे. हा अहवाल उद्धव ठाकरे यांचे सरकार असतानाच आला आहे. पण त्यांनी त्यावर काहीही कारवाई केली नाही. आरोपी आणि साक्षीदार यांची एकत्रित भेट एक डीसीपी करून देत होता, असा उल्लेख आहवालात आहे. अनेक पुरावे मला दिसत होते. पण यांच्या साटेलोटं असल्यामुळे मला ते रेकॉर्डवर घेता आले नाही”, असा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“महाविकास आघाडीच्या काळात हा भ्रष्ट्राचार आहे. वसुलीचे यापेक्षा मोठे पुरावे काहीच असू शकत नाहीत. सचिन वाझेने कोर्टाला पत्र लिहलं. त्यात त्याच्यावर कसा दबाव आणला हे सांगितलं. हे प्रकरण गंभीर आहे. गृहमंत्री आणि त्याकाळचे सरकार यामध्ये इनव्हॉल आहे का? त्याची चौकशी करणे गरजेचं आहे. जाणीवपूर्वक या सगळ्या लोकांनी मला गोवण्याचा प्रयत्न केला. पण जे केलंच नाही त्याला डर कशाचा? त्यामुळे ते मला गोऊ शकले नाहीत. हा धक्कादायक खुलासा आल्यानंतर माझं मत आहे एक फ्रेश चौकशी या प्रकरणाची केली पाहिजे”, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.