AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये मोठी धुसफूस, पत्रकार परिषद घेत थेट राजीनामा, नेमकं काय घडलं?

भाजपमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. विशेष म्हणजे आगामी काळात महाराष्ट्रात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आागामी काळात लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. असं असताना भाजपमध्ये पक्षांतर्गत दबावामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेत थेट राजीनामा दिला आहे.

भाजपमध्ये मोठी धुसफूस, पत्रकार परिषद घेत थेट राजीनामा, नेमकं काय घडलं?
BJP
| Updated on: Dec 14, 2023 | 9:59 PM
Share

धुळे | 14 डिसेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक असणार आहेत. या निवडणुका चार ते पाच महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. अशा परिस्थितीत कार्यकर्ते खूश कसे असतील, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आनंदाने पक्षासाठी निवडणुकीसाठी कामकाज कसे पाहतील याबाबत रणनीती प्रत्येक पक्षात आखली जात आहे. असं असाताना धुळ्यात भाजमधील मोठी धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पक्षांतर्गत दबावला बळी पळून भाजप धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील यांनी अखेर स्वखुशीने राजीनामा देत असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. यावेळेस त्यांनी केलेल्या कामाची माहिती पत्रकारांना दिली. 14 महिन्यांच्या कार्यकाळामध्ये आपण चांगले काम केल्याचा दावा अश्विनी पाटील यांनी केला आहे. कमी वयाच्या आणि उच्च शिक्षित अध्यक्ष म्हणून त्यांनी लौकिक मिळवला. मात्र पक्षांतर्गत राजीनामाचा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आला.

सुभाष भामरे यांच्या गटाला धक्का

गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्याच पक्षाचे सदस्य हे त्यांच्या राजीनामासाठी आग्रही होते. अखेर पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाप्रमाणे आपण स्वखुशीने राजीनामा देत असल्याचं अश्विनी पाटील यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे कुठेतरी खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या गटाला धक्का बसला असून, आमदार जयकुमार रावल यांच्या गटाच्या पथ्यावर हा निर्णय पडणार असल्याचं दिसून येत आहे.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....