AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय, पण…; नाना पटोले यांचा थेट हल्लाबोल

Nana Patole on BJP Maharashtra and Chhatrapati Shivaji Maharaj : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला भाजप बरबाद करतंय..., असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. तसंच इतर मुद्द्यांवर पटोले काय म्हणाले? वाचा...

भाजप शिवरायांचा महाराष्ट्र पेटवतंय, पण...; नाना पटोले यांचा थेट हल्लाबोल
Nana Patole
| Updated on: Dec 14, 2023 | 10:47 AM
Share

नागपूर | 14 डिसेंबर 2023 : महाराष्ट्र पेटवून भाजपला काय प्राप्त होतं आहे? समजत नाही. सरकार कसं पाप करत आहे. मंत्रीच सांगत आहेत. महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका यांनी घेतली आहे. आज राज्यात शासकीय व्यवस्था कोलमडली आहे. सरकारी कर्मचारी, परिचारिका संपावर आहेत. शेतकरी आत्महत्या करत आहे. सर्व समाजाचे शेतकरी आहेत. पण सरकारला जनतेचं काहीही पडलेलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कधी उत्तर देणार? ते समजत नाही. महाराष्ट्रात भयावह परिस्थिती आहे. जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा आहे. शिवरायांचा महाराष्ट्र पेटवला जात आहे. तो शांत केला पाहिजे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

“सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलंय”

राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज्य सरकारमध्ये काय चाललं आहे? यांनी महाराष्ट्र पेटवण्याची भूमिका घेतली आहे. आज सरकारी व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्र बरबाद करण्याचे काम भाजप सरकारच्या काळात झालंय. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसावर चर्चा संपली. मुख्यमंत्री उत्तर देतील असे कळत होते पण त्यांनी अजून उत्तर दिलं नाही. उद्या उत्तर देणार असं कळतंय. या लोकांनी जनतेला वाऱ्यावर सोडलंय, असं म्हणत पटोलेंनी घणाघात केलाय.

पोटनिवडणुकीवर पटोले म्हणाले…

कोणत्याची लोकप्रतिनिधीचा मृत्यू होतो. तर तिथे पोट निवडणूक घेतली पाहिजे. पण केंद्र सरकारच्या दबावात येऊन निवडणूक आयोग निर्णय घेत नाही. म्हणून न्यायालयाने यांना फटकारलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.

“आज मुख्यमंत्र्यांना पुरावे देणार”

पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती आहे. जे आरोप केले जात आहेत. त्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी, असं मुख्यमंत्री म्हणाले. आज मी लेखी स्वरूपात सर्व पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांना देणार आहे. आयुक्तांवर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असंही नाना पटोले म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.