AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिर्याणीतून विषबाधा की कलिंगडातून मुंबईतील त्या कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, चारही जण..

मुंबईच्या पायधुणी परिसरात धक्कादायक घटना घडली. थेट बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जीव गेला. ज्याने एकच खळबळ उडाली. आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक अशी माहिती पुढे येत आहे.

बिर्याणीतून विषबाधा की कलिंगडातून मुंबईतील त्या कुटुंबावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा, म्हणाले, चारही जण..
Mumbai 4 people died eating watermelon on biryani
| Updated on: Apr 29, 2026 | 10:56 AM
Share

मुंबईच्या पायधुणी परिसरात धक्कादायक घटना घडली. बिर्यानी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा अत्यंत दुर्दैवी अंत झाला. या घटनेनंतर अनेकांनी कलिंगडावर बहिष्कार टाकला. उन्हाळ्याच्या हंगामात गार गार कलिंगड खाण्याची मजाच वेगळी आहे. मात्र, बिर्यानी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्याने चार जणांना जीव गमवावा लागला. यादरम्यानच कलिंगडावर रासायनिक प्रक्रिया झाल्यानेच ही घटना घडली का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात सर्व बाजूने चाैकशी केली जात आहे. विषबाधा नक्की बिर्यानीतून झाली की कलिंगडातून याचा तपास सुरू आहे. यादरम्यानच या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या कुटुंबाला ज्यावेळी त्रास सुरू झाला, त्यावेळी नक्की काय घडले हे त्यांच्यावर सर्वात प्रथम उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. यासोबतच अजून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे.

मृतांच्या शरीरात पेनकिलरसदश पदार्थ आढळल्याची शक्यता आहे. शवविच्छेदनादरम्यान या संशयित पदार्थ आढळल्याची माहिती मिळत आहे. मात्र, फॉरेन्सिक अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होईल. सामान्य अन्नदूषितमुळे इतक्या वेगाना मृत्यू होणे दुर्मिळ असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. डॉ. झेथ कुरेशी यांनी याबाबत मोठा खुलासा केला. ज्यावेळी या कुटुंबाला त्रास होत होता, त्यावेळी त्यांच्या उपचारासाठी सर्वात अगोदर डॉ. झेथ कुरेशी पोहोचले होते.

झेथ कुरेशी यांच्या कुटुंबासोबत त्यांचे बोलणे झाले होते. डॉ. झेथ कुरेशी यांनी म्हटले की, ज्यावेळी मी पहिल्यांदा तिथे पोहोचलो होतो. त्यावेळी ते लोक अशा स्थिती नव्हते की, ते मला काही बोलू शकतील किंवा सांगू शकतील. त्यांची तब्येत खूप जास्त खराब होती. माझे बोलणे अब्दुला यांच्यासोबत झाले. दुपारी 1 ते 2 दरम्यान माझे त्यांच्यासोबत बोलणे झाले होते. त्यावेळी मी त्यांना विचारले होते की, तुम्ही हे कलिंगड कधी खाल्ले. त्यांनी मला स्वत: सांगितले होते की, ज्यावेळी त्यांनी हे कलिंगड खाल्ले त्यावेळी त्यांनी स्वत: कलिंगड कट केले होते.

त्यावेळीच त्यांनी चार जणांनी कलिंगड खाल्ले होते. अर्धे उरलेले कलिंगड त्यांनी फ्रीजमध्ये ठेवले. ते काहीच प्रतिसाद देते नव्हते. फक्त डोळे त्यांची उघडी होती. पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली होत्या. त्यामधील त्यांच्या एका मुलीची स्थिती गंभीर होती. मुलीला आम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचवले. पण रस्त्यामध्येच तिने जीव सोडला. बाकी जे तीन होते त्यांना आम्ही जेजे रूग्णालयात शिफ्ट केले. तिथे त्यांच्यावर काहीवेळ उपचार करण्यात आली पण काही वेळात त्यांचेही निधन झाले.

Follow Us
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट
विझलो आज जरी मी... भाजपकडून विश्वासू नेत्याचा पत्ता कट.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी आज मतदान.
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच
बच्चू कडूंच्या विधान परिषद प्रवेशावर अट; शिंदे गटात विलिनीकरणाचा पेच.
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......