AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोंबिवलीत रिक्षा चालकाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

डोंबिवलीच्या मोठागावमध्ये एका रिक्षा चालकाने अपघातानंतर कार चालकाकडून दोन लाख रुपयांची भरपाईची मागणी केल्यामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली. मुंजाजी शेळके या 70 वर्षीय रिक्षा चालकाने कार अपघातातून मानसिक त्रास सहन करून गळफास घेतला.

डोंबिवलीत रिक्षा चालकाची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
dombivali rickshaw
| Updated on: Jun 25, 2025 | 3:25 PM
Share

डोंबिवलीच्या मोठा गाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका कार चालकाने 70 वर्षीय रिक्षा चालकाकडून दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितल्याने त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंजाजी शेळके असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. मुंजाजी शेळके यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ज्यामुळे डोंबिवली शहर हादरलं आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील मोठा गाव परिसरात मुंजाजी शेळके हे रिक्षा चालवत असताना त्यांनी एका कारला धडक दिली. हा अपघात झाल्यानंतर कार चालकाने शेळके यांना पकडून ठेवलं. त्यानंतर त्यांना खूप मारहाण केली. पहाटे ३ वाजता त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र त्यावेळी शेळके यांच्याकडून कार चालकाने दोन लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली. दोन लाख रुपये कुठून आणायचे? या विचाराने मुंजाजी शेळके मानसिक तणावात होते.

घरी गळफास लावून आत्महत्या

त्यानंतर या सगळ्या मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी टोकाचं पाऊल उचलत आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यामुळे डोंबिवली शहर हादरलं. या घटनेमुळे संतापलेल्या शेळके यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील विष्णू नगर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

कसून चौकशी सुरु

जोपर्यंत दोषींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. सध्या विष्णू नगर पोलीस स्टेशनवर रिक्षाचालक आणि नातेवाईकांची मोठी गर्दी जमली आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. या घटनेमुळे शहरात सध्या तणावाचं वातावरण आहे.

Follow Us
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच