AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jaragne Patil : …तर ओबीसीचे 16 टक्के आरक्षण गेलेच म्हणून समजा, मनोज जरांगेंच डायरेक्ट चॅलेंज

"सरकारने आता जीआर मध्ये काहीही घालायचे नाही आणि काढायचे नाही. जर का यात काही गडबड केली तर मग मात्र महाराष्ट्र बंद करणार. आम्ही आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही" असं मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बोलले.

Manoj Jaragne Patil : ...तर ओबीसीचे 16 टक्के आरक्षण गेलेच म्हणून समजा, मनोज जरांगेंच डायरेक्ट चॅलेंज
manoj jarange patil
| Updated on: Sep 09, 2025 | 1:14 PM
Share

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. “आमच्या हैद्राबाद गॅझेटच्या जीआरविरोधात कोर्टात गेलात तर आम्ही 1994 च्या जीआर विरोधात कोर्टात जाणार. जर मराठ्यांचे वाटोळे करण्याचे काम भुजबळने केले तर ओबीसीचे 16 टक्के आरक्षण गेलेच म्हणून समजा. मुळात तुम्ही 16 टक्के आरक्षण हे मराठ्यांच्या वाट्याचे खात आहात” असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला. “त्यामुळे त्यांनी आमच्या जीआरला चॅलेंज दिले की आम्ही 1994 च्या जीआरला चॅलेंज करणार” असं जरांगे पाटील बोलले.

“आमच्या समाजातील काही लोकं आमच्यावर टीका करत आहेत. पण त्यांनी आजपर्यंत समाजाला काहीही दिलेले नाही. राज्यात कुणीही आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा काढला की चर्चेला हेच लोकं जाणार. यांचे कपडे, गाड्या, चष्मे आणि सेंटचा वासच मराठ्यांनी पाहिला आहे. मात्र आमच्या आंदोलनानंतर मिळालेले यश आता यांना बघवत नाही. त्यामुळे यांची वळवळ सुरु झालीय” अशी मनोज जरांगे यांनी विनोद पाटील यांच्यावर टीका केली. “यातील एक माजी मंत्र्याचा मावस भाऊ आहे (राजेश टोपेंचा भाऊ संजय लाखे पाटील) आणि दुसरा सांगलीतील माजी गृहमंत्र्यांचा पाहुणा आहे. यांनी आजवर कोर्ट कागद,चर्चा, मंत्र्यांच्या भेटीगाठी एवढच केलंय” असं जरांगे पाटील म्हणाले.

‘आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही’

“सरकारने आता जीआर मध्ये काहीही घालायचे नाही आणि काढायचे नाही. जर का यात काही गडबड केली तर मग मात्र महाराष्ट्र बंद करणार. आम्ही आता कायदा सुव्यवस्था पाहणार नाही” असं मनोज जरांगे पाटील चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल बोलले.

‘आमच्या निर्णयात कसलाही बदल करायचा नाही’

“कोणत्याही बैठका घेऊदेत पण आमच्या निर्णयात कसलाही बदल करायचा नाही. जर का काही बदल केलात, तर मात्र राज्यातील सर्व रस्ते बंद करुन टाकणार” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी उपसमिती बैठकीवर दिला.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.