AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Report : पारा घटला, अवकाळीचा धोका मात्र वाढला, 2 दिवस कसे राहणार हवामान?

उन्हाळ्याला सुरवात होताच उत्तर महाराष्ट्रात मात्र, अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता परस्थिती बदलली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उन्हाच्या झळा ह्या वाढणारच असल्याचा अंदाज आहे. सोमवारी चंद्रपूरात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

Weather Report : पारा घटला, अवकाळीचा धोका मात्र वाढला, 2 दिवस कसे राहणार हवामान?
मान्सूनला भारतामध्येच नव्हे तर अशिया खंडात अनन्यसाधारण महत्व आहे.
| Updated on: May 03, 2022 | 2:11 PM
Share

पुणे : यंदाच्या (Summer Season) उन्हाळ्यात राज्यात समसमान तापमान स्थिती अशी परस्थितीच निर्माण झाली नाही. कायम निसर्गाचा लहरीपणान अनुभवयास मिळाला आहे.उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरु असताना मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढल्या होत्या. आता राज्यात (Temperature) तापमानाचा पारा घटला असला तरी उत्तर महाराष्ट्रात तापमानात वाढ झाली आहे. तर (Marathwada) मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सध्या काही भागात वाढते तापमान तर दुसरीकडे पावसाचा अंदाज अशी स्थिती निर्माण झाली आहे. सबंध उन्हाळा संपत आला तरी ऊन-पावसाचा खेळ काही संपला नाही.

उत्तर महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम

उन्हाळ्याला सुरवात होताच उत्तर महाराष्ट्रात मात्र, अवकाळीने हजेरी लावली होती. त्यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता परस्थिती बदलली असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे जळगाव, नंदुरबार आणि पश्चिम महाराष्ट्रातील नगरमध्ये उन्हाच्या झळा ह्या वाढणारच असल्याचा अंदाज आहे. सोमवारी चंद्रपूरात सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. विदर्भातही पारा 44 अंश सेल्सिअसपर्यंत आहे. असे असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत तापमानात झालेली घट ही सर्वसामान्यांसाठी समाधानकारक आहे.

मराठवाड्यासह पश्चिम महाष्ट्रात पावसाच्या सरी

उत्तर महाराष्ट्र उन्हामध्ये होरपळत असला तरी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळीची अवकृपा ही राहणारच आहे. 4 मे रोजी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिगोली, नांदेड, लातू, उस्मानाबाद आदी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर विजेच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

गतआठवड्यापेक्षा पारा घटला

विभागानिहाय तापमानात बदल असला तरी गतआठवड्याच्या तुलनेत घट झाली आहे. सध्या सरासरीपेक्षा अधिकचे तापमान असले तरी चालू आठवड्यात हा टक्का कमी झाला आहे. यामुळे दिलासा मिळाला नसला तरी ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यात धग ही कायम आहे. मराठवाड्यात परभणी, नांदेडचे तापमान हे 43 अंश सेल्सिअस एवढे होते. अशीच परस्थिती पश्चिम महाराष्ट्र आणि इतर ठिकाणीही निर्माण झाली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.