AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनाचा असाही फटका, खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरात दुपटीने वाढ

मराठा आंदोलन चिघळल्याने रास्तारोको आणि दगडफेकीने एसटी आणि खाजगी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी सेवा त्यामुळे बंद करण्यात आली आहे. याचा फायदा घेऊन आता खाजगी ट्रॅव्हल्स पुणे - नागपुर आणि नागपूर - संभाजीनगर भाड्यात मोठी वाढ केली आहे.

मराठा आंदोलनाचा असाही फटका, खाजगी ट्रॅव्हल्सच्या दरात दुपटीने वाढ
busImage Credit source: socialmedia
| Updated on: Nov 02, 2023 | 2:23 PM
Share

मुंबई | 2 नोव्हेंबर 2023 : मराठा आंदोलनाचा फटका राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी सेवेला बसला आहे. मराठवाड्यात अनेक भागात एसटीची तोडफोड झाली आहे. त्यामुळे अनेक बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील जवळपास 50 एसटी डेपोची बस वाहतूक दक्षता म्हणून गेल्या पाच दिवसांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्याचा परिणाम खाजगी बस वाहतूकीने दरवाढ करण्यात झाला आहे. प्रवासी संख्या घटल्याने तसेच धोका पत्करून बस सेवा चालवावी लागत असल्याने ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नागपूरने तिकीटाचे दर वाढविले आहेत.

मराठा आंदोलन चिघळल्याने रास्तारोको आणि दगडफेकीने एसटी आणि खाजगी बसेसचे मोठे नुकसान झाले आहे. एकट्या बीड जिल्ह्यात 75 हून अधिक एसटी बसेसची तोडफोड झाल्याने एसटी महामंडळाचे 20 कोटीहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. मराठा आरक्षण आंदोलनामुळे 20 ते 22 खाजगी बसेसचे तोडफोड झाली आहे. त्यामुळे धोका पत्करून बस चालवाव्या लागत आहेत. त्यातच 20 ते 25 टक्के प्रवासी घटल्याने परतीच्या बसेस रिकाम्या येत आहेत. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर ट्रॅव्हल्स असोसिएशन ऑफ नागपूर या संघटनेने तिकीट दरात वाढ केली आहे. नागपूर – पुणे , नागपूर – संभाजीनगर खाजगी बसेसच्या तिकीटाचे दर 3500 रुपये म्हणजेच जवळपास दुप्पट झाले आहेत. दिवाळीमुळे बसेस चालवाव्या लागत अनेक बसेसचे मार्ग बदलावे लागल्याने तिकीटदरात वाढ केल्याचे ट्रव्हल्सचे अध्यक्ष बाबा डवर यांनी म्हटले आहे. बसेसवर अशीच दगडफेक सुरु राहिल्यास सेवा बंद ठेवावी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.

येवला बस आगार ठप्प

मराठा क्रांती मोर्चा हिंगोलीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यांमध्ये 22 ठिकाणी चक्काजाम आंदोलन झाले. नांदेड, हिंगोली राज्य महामार्ग नांदेड,परभणी राज्य महामार्ग त्याचबरोबर जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील सर्व राज्य महामार्गावर हे आंदोलन झाले. येवला आगाराची बस सेवा मंगळवारपासून बंद असल्याने 132 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येवला आगाराते तीन लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाला गेल्या पाच-सहा दिवसात 20 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॉवरवर चढून आंदोलन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील दोन युवकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. आरक्षण न मिळाल्यास टावरवरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. उमेश प्रकाश शिरगिरे आणि आबा जाधव अशी त्यांची नावे असून पोलीसांनी हस्तक्षेप करून त्यांना रोखल्याने पुढील अनर्थ टळला.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत