Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘घर जाळलं, मुलींना मारहाण केली, कोंबडे घेऊन गेले…’, खोक्याची भावजयी नेमकं काय म्हणाली?

रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली. त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता त्याच्या नातेवाईकांकडून माहिती समोर आली आहे.

'घर जाळलं, मुलींना मारहाण केली, कोंबडे घेऊन गेले...', खोक्याची भावजयी नेमकं काय म्हणाली?
Follow us
| Updated on: Mar 14, 2025 | 10:05 PM

गेल्या काही दिवसांपासून सतीश उर्फ खोक्या भोसले हा चांगलाच चर्चेमध्ये आहे. शिरूरमधील ढाकणे कुटुंबाला झालेल्या मारहाणीनंतर तो फरार होता. अखेर पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधून त्याच्या मुसक्या आवळल्या, त्यानंतर आता त्याचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकरणात गुन्हे देखील दाखल झाले आहेत. दरम्यान खोक्याचं घर हे वनविभागाच्या जागेत असल्याचं समोर आलं होतं, त्यानंतर वनविभागाकडून त्याला नोटीस देखील देण्यात आली होती. या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अखेर गुरुवारी वनविभागाकडून खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आलं, त्याचं घर पाडण्यात आलं.

मात्र त्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली ती म्हणजे रात्रीच्या वेळी अज्ञात लोकांनी खोक्याच्या पाडलेल्या घराला आग लावली. त्यावेळी नेमकं तिथे काय घडलं? याबद्दल आता त्याच्या नातेवाईकांकडून माहिती समोर आली आहे. खोक्याची भावजयी अर्चना भोसले यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, रात्री आमचे लेकबाळ येथे झोपले होते, आमच्या शेळ्या मारून टाकल्या, कोंबडे घेऊन गेले, मुलींना सुद्धा खूप मारलं. ते लोक म्हणत होते तुमचे घर पाडले तुम्ही इथे कसे राहता तुमचा काय संबंध आहे. वीस पंचवीस जण होते. आता या प्रकरणात फडणवीस साहेबांनी कारवाई केली पाहिजे, आम्हाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी अर्चना भोसले यांनी केली आहे.

तर खोक्या भोसलेची दुसरी भावजयी शालन भोसले यांनी सांगितलं की, काल आम्ही इथे झोपलो होतो, त्याचवेळी ही घटना घडली आहे. मारहाण करण्यात आली. आम्ही सर्वजण सरकारी दवाखान्यात आहोत, आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी शालन भोसले यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं?

खोक्याचं घर हे वनविभागाच्या जागेवर होतं, ते गुरुवारी पाडण्यात आलं. मात्र त्यानंतर पाडलेल्या घराला रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी आग लावल्याची घटना घडली आहे. यावेळी मारहाण देखील केल्याचा आरोप खोक्याच्या नातेवाईकांनी केला आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.