AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये आयशर, पिकअपचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत.

नाशिकमध्ये आयशर, पिकअपचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी
| Updated on: Jan 12, 2025 | 9:39 PM
Share

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे, नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. नाशिक- मुंबई- अग्रा महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात झाला आहे. पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली.  या घटनेत मृत्यू झालेले सर्वजण कामगार असल्याची माहिती समोर येत आहे. अपघातातील मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीयेत.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. लोखंडी गजाने भरलेल्या आयशर गाडीला पाठीमागून वेगात आलेल्या पिकअप गाडीने धडक दिली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेतील सर्व मृत आणि जखमी हे कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक- मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

नाशिकच्या द्वारका उड्डाणपूलावर हा अपघात झाला आहे.  पिकअप आणि आयशरमध्ये हा अपघात झाला. पिकअपने आयशरला मागून धडक दिली. या अपघामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. नाशिकवरून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, उड्डाण पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वाहतूक ठप्प झाली आहे.

वाहनांचा चुराडा 

हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. वाहनांचा चुरडा झाला आहे. या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून, हळहळ व्यक्त होत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.