AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याचं स्पष्ट मत, आता ते…

"ठेकेदारांचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा द्या, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. मात्र कधीही मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली आहे"

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याचं स्पष्ट मत, आता ते...
Sharad Pawar-Ajit Pawar
| Updated on: Feb 12, 2026 | 1:23 PM
Share

“पुढील अर्थसंकल्पात आम्ही शहरासाठी 1500 कोटी मागत आहोत, शहराची वाढती लोकसंख्या, येणारे उद्योग पाहून जिल्ह्याला भरीव तरतूद आली पाहिजे. आता पर्यंतचा शहराचा बॅकलॉग भरून निघाला नाही. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष देऊन न्याय देतील अशी अपेक्षा” असं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री संजय शिरसाट म्हणाले. “राष्ट्रवादीमधे अंतर्गत सुरू असलेल्यां वादावर आम्ही बोलणं योग्य नाही. त्यांच्यातील एक गट विलीनीकरण होय म्हणतोय तर दुसरा नाही म्हणतोय. आता दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होईल, असं शक्य वाटत नाही. आता जुन्या गोष्टींवर बोलणे योग्य नाही. दोन्हीकडील नेत्यांनी बसवून ठरवलं पाहिजे. काही नेत्यांना विलीनीकरण मान्य नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे.रोहित पवार यांनी केलेल्या सर्व आरोपांची छाननी होईल. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्या चौकशी अहवालात सर्व स्पष्ट होईल” असं संजय शिरसाट म्हणाले. “निवडणूक हरल्यावर मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटते. मात्र पराभव हा पराभव असतो. यामध्ये तंत्,मंत्र अवलंबले जातात ते सर्वांनी मान्य केलं पाहीजे” असं उद्धव ठाकरे यांच्या जिल्हा परिषदेसंदर्भातल्या वक्तव्यावर संजय शिरसाट म्हणाले.

यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली

“न्यायालयाने जे ताशेरे ओढले ते अत्यंत अनुभवातून केलं आहे. ठेकेदारांचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा द्या, असं आम्ही नेहमी म्हणत होतो. मात्र कधीही मुंबईकरांकडे लक्ष दिले नाही. यावेळी मुंबईकरांनी योग्य माणसाकडे सत्ता दिली आहे” असं संजय शिरसाट मुंबईच्या महापौर पदावरुन म्हणाले. “राजेंद्र जंजाळ सारखे सर्वगुण संपन्न नेतृत मिळालं हे आमचं भाग्य आहे. अन्यथा आम्ही मुकलो असतो. भविष्यात ते महाराष्ट्राचे मुखमंत्री व्हावे” असं शिरसाट म्हणाले.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.