AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde | शिंदे हायकोर्टाऐवजी सुप्रीम कोर्टात का गेले? एकनाथ शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी दिली 3 कारणं…

महाविकास आघाडीतील 50 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला असला तरीही राज्यात सरकार कसं चालतंय, असा सवालही नीरज कौल यांनी युक्तिवाद सुरु असताना केला.

Eknath Shinde | शिंदे हायकोर्टाऐवजी सुप्रीम कोर्टात का गेले? एकनाथ शिंदेंचे वकील नीरज कौल यांनी दिली 3 कारणं...
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jun 27, 2022 | 3:38 PM
Share

नवी दिल्लीः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारदरम्यान दोन याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुनावणी सुरु आहे. दुपारी साधारण दीड वाजेच्या सुमारास दोन्ही पक्षातील वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तीवाद सुरु केला. सुनावणी सुरु होताच, महाराष्ट्राच्या राजकारणातील हा वाद मुंबई हायकोर्टात न मांडता तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे का आलात, असा सवाल करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी युक्तिवाद करताना माझ्याकडे या प्रश्नासाठी तीन उत्तरं आहेत, असं सांगितलं. शिवसेनेने अजय चौधरी यांची विधीमंडळ गटनेतेपदी केलेली निवड आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना दिलेली अपात्रतेची नोटीस याविरोधात बंडखोर शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. यावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे.

वकील नीरज कौल यांनी दिलं उत्तर…

महाराष्ट्राच्या राजकारणाविषयीचा मुद्दा सुप्रीम कोर्टासमोर का आणला, हायकोर्टात का गेला नाहीत, असा सवाल एकनाथ शिंदेंच्या वकिलांना करण्यात आला. यावेळी त्यांनी तीन उत्तरं दिली. 1. मुंबईत सध्या आम्हाला आमचे अधिकार वापरता यावेत, असं वातावरण नाही. 2. शिवसेना नेत्यांकडून आम्हाला धमकी दिली जातेय. आम्हाला मारून टाकण्याची भाषा केली जातेय. घरांवर हल्ले होतायत. 3. आमची 40 शव परत येतील आणि रेड्यासारखं कापलं जाईल, अशी धमकी संजय राऊत यांनी दिलीय, अशा स्थितीत मुंबई हायकोर्टात खटला चालवण्यासारखी स्थिती नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी दिलं.

अल्पमतात असतानाही राज्यात सरकार कसं?

महाविकास आघाडीतील 50 आमदारांनी पाठिंबा काढून घेतला असला तरीही राज्यात सरकार कसं चालतंय, असा सवाल नीरज कौल यांनी युक्तिवाद सुरु असताना केला. तसेच विधानसभा उपाध्यक्ष नगरहरी झिरवळ यांच्या विरोधातच अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते आमदारांना अपात्र कसं ठरवू शकतात? असाही सवाल नीरज कौल यांनी केला आहे.

बंडखोरांविरोधात नवी जनहित याचिका

दरम्यान, बंडखोर आमदार आणि मंत्र्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड. असीम सरोदे यांच्या वतीने सजग नागरिकांनी ही याचिका दाखल केली असून महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी अशा प्रकारे राज्य सरकारच्या कामात अडथळा आणून राज्याबाहेर कसं जाऊ शकतात. त्यांनी तातडीनं विधानभवनात हजेरी लावून कामं हातात घ्यावीत, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावर आजच सुनावणी करण्याची विनंतीही जनहित याचिकेत करण्यात आली आहे.

Follow Us
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल