AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक, शेतकरी आक्रमक

वाढत्या आवकीमुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडलेले पहायला मिळाले. केवळ 3200 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक, शेतकरी आक्रमक
भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: May 28, 2021 | 6:37 PM
Share

बुलडाणा : खामगाव स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी, आज बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. भुईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा संताप इतका विकोपाला गेला की यावेळी तुरळख दगडफेकही झाली. या दगडफेकीत दोन शेतकऱ्यांसह एक पोलिसही जखमी झाला आहे. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

भुईमूगाची आवक वाढल्याने दर घसरले

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकीमुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडलेले पहायला मिळाले. केवळ 3200 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विघ्नसंतोषी लोकांनी शेतकऱ्यांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. यावेळी प्रतिउत्तरात शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलिसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला आहे.

त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या हॉटेलमधील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. भुईमूगाला योग्य भाव मिळावा हीच मागणी शेतकऱ्यांची असून सुरुवातीला 5 हजाराच्या वर भाव मिळाला आणि नंतर 3 ते साडेतीन हजार भाव व्यापाऱ्यांकडून मिळत होता, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.

पोलीस घटनास्थळी पोहचताच धावपळ

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाल्याचे समजताच पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांच्या गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकऱ्यांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. पोलिस कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून यावेळी काढता पाय घेतला. बाजार समिती प्रशासकांसोबत चर्चा केल्यानंतर गोंधळ थोडा शांत झाला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

इतर बातम्या

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

Big Investment | अमिताभ बच्चन बनणार सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केले 31 कोटींचे घर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली