AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले यांना होमग्राऊंडवर धक्का, गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा

एकीकडे कॉंग्रेस पक्षाचे आज छत्तीसगड येथील रायपुर येथे महाअधिवेशन पार पडत असतांना नाना पटोले यांच्या होमग्राऊंडवरील पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

नाना पटोले यांना होमग्राऊंडवर धक्का, गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Feb 24, 2023 | 4:43 PM
Share

शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ( Congress ) मधील थोरात आणि पटोले ( Thorat Vs Patole ) यांच्यातील वाद चव्हाट्या वर आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यावर कॉंग्रेस पक्षातील विविध नेत्यांनी गंभीर आरोप करत नाना पटोले यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ही संपूर्ण परिस्थिती ताजी असतानाच आता नाना पटोले यांच्याच होमग्राऊंड असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत रत्नदीप दहीवले यांनी राजीनामा दिला आहे. रत्नदीप दहीवले हे गोंदिया जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष होते.

एकीकडे कॉंग्रेस पक्षाचे आज छत्तीसगड येथील रायपुर येथे महा अधिवेशन पार पडत आहे. त्या दरम्यान कॉंग्रेस पक्षातील विविध नेते या महाअधिवेशनाला हजेरी लावणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील थोरात पटोले वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्या कारभारावर कॉंग्रेस मधील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई केली जाईल का ? अशी चर्चा असतांना गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या रत्नदीप दहिवले यांनी राजीनामा दिला आहे. दहिवले यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून राजीनामा दिला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काम करु देत नसल्याच्या आरोप करत गोंदिया जिल्हा कांग्रेस कार्याध्यक्षाने राजीनामा दिल्याने राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. आधीच अडचणीत असलेले नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत नाराजी व्यक्त केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रत्नदिप दहीवले यांनी राजीनामा देत असतांना म्हंटलंय की, विशेष म्हणजे 30 वर्षापासून आपण कांग्रेसशी जोडलो गेलेलो असतांना सुद्धा आज नाना पटोले यांच्या कारभारामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.

नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून दुसऱ्या पक्षातील येणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळत नाही असं रत्नदिप दहीवले यांनी म्हंटलं आहे. एकूणच नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

जेव्हा पासून नानां पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पासून आम्हाला काम करु देत नसल्याचा आरोप दहीवाले यानी केला आहे. त्यामुळे रायपुर येथील अधिवेशनाच्या तोंडावर राजीनामा दिल्याने कॉंग्रेस पक्षात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप