AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडीसेविकेच्या वारसांना महिला व बालविकास विभागाची 50 लाखाची मदत

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या फ्रंट लाईन वर्कर्सना राज्य सरकारच्या माध्यमातून आज 50 लाख रुपयांचा चेक देऊन मदत करण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडीसेविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अश्या अंगणवाडीसेविकांच्या वारसांना आज मदत देण्यात आली.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडीसेविकेच्या वारसांना महिला व बालविकास विभागाची 50 लाखाची मदत
कोरोना योद्ध्यांच्या वारसाला पुण्यात आर्थिक मदत
| Edited By: sagar joshi | Updated on: Feb 03, 2022 | 11:19 PM
Share

पुणे : कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांनी आपले प्राण (Corona Death) गमावले. तसंच जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य लोकांची सेवा करणाऱ्या कोरोना योद्ध्यांनाही कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अशाच एका कोरोना योद्ध्याच्या (Corona Warrior) वारसाला पुण्यात महिला व बालविकास विभागाकडून (Women and Child Development Department) 50 लाखाची आर्थिक मदत करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या फ्रंट लाईन वर्कर्सना राज्य सरकारच्या माध्यमातून आज 50 लाख रुपयांचा चेक देऊन मदत करण्यात आली. महिला आणि बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडीसेविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला अश्या अंगणवाडीसेविकांच्या वारसांना आज मदत देण्यात आली.

पुण्यातील प्रेमनगर भागात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या सविता शिळीमकर यांचा कर्तव्यावर असताना 14 एप्रिल 2021 रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर आता सविता शिळीमकर यांच्या कुटूंबियांना महिला आणि बालविकास विभागाकडून 50 लाख रुपयांची मदत देण्यात आली. शिळीमकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटूंबियांचा उदरनिर्वाहचे संकट उभे ठाकले होते. मात्र 50 लाखांची आर्थिक मदत मिळाल्यामुळे शिळीमकर यांच्या मुलांच्या शिक्षाणाचा प्रश्न आता सुटला आहे. यावेळी ज्या कोरोना योद्धांच्या कुटुंबालामदत मिळाली त्यांनी महिला आणि बालविकास विभागाचे आभार मानले.

आर्थिक मदतीसाठी पीडित कुटुबियांकडून ऑफलाईन अर्जही स्वीकारा- हायकोर्ट

कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची आर्थिक मदत करताना ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जाचाही विचार करावा. केवळ ऑनलाईनची सक्ती नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले आहेत. कोरोनामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्य सरकारांना अशा कुटुंबियांना 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले होते.

ऑनलाईनचा आग्रह नको

राज्य सरकारनं अशा पीडित कुटुबियांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यास सांगितलं होतं. मात्र, फक्त ऑनलाईन अर्जाची सक्ती करु नका. प्रत्यक्ष अर्थात ऑफलाईन येणाऱ्या अर्जांचाही विचार करावा असा आदेश हायकोर्टानं दिला आहे. ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज करणं शक्य होत नाही अशा कुटुबियांना ऑनलाईनसाठी आग्रह धरू नका, असं हायकोर्टानं म्हटलंय.

इतर बातम्या :

बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता, नेमकं वक्तव्य काय?

Video : बंडातात्या कराडकर यांचं सुप्रिया सुळे, पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य! आता माफी मागायलाही तयार

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली