AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 10 तासांनी भिवंडीतील आगीवर नियंत्रण, नुकसान किती?

भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन कंपनीला मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. | Fire control in Bhiwandi MIDC

तब्बल 10 तासांनी भिवंडीतील आगीवर नियंत्रण, नुकसान किती?
Bhiwandi Fire In Conrol
| Updated on: Jan 28, 2021 | 3:29 PM
Share

भिवंडी :  तालुक्यातील सरवली एमआयडीसी परिसरातील कपिल रेयॉन (Major Fire Broke Out At Bhiwandi MIDC) कंपनीला मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल 10 तासानंतर भिवंडीतील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. (Fire control in Bhiwandi MIDC kapil Reyon after 10 hours)

पाण्याची कमतरता असल्याने पाणी आणण्यासाठी अग्निशामक दलाला 4 किलो मीटर लांब जावं लागत असल्याने आग विझवण्यात अडळथा निर्माण होत होता. कापडाची कंपनी असल्याने विझलेली आग पुन्हा पेटते आहे. त्यामुळे इथून पुढचे काही तास कुलिंगचे काम सुरु राहील .

आगीत कोट्यवधी रुपयांच्या मशीन, कपडा जळून खाक झालेला आहे. ही कंपनी दोन मजली आहे. पहाटे आग लागल्यानंतर भिवंडी महापालिकेच्या 2 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. परंतु आगीची तीव्रता इतकी होती की तिने अग्र स्वरुप धारण करत संपूर्ण इमारतीवर ताबा मिळवला. मात्र, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

3 वारपिंग ,1 सायझिंग मशीनसह 77 अत्याधुनिक यंत्रमाग आणि कच्चामाल तसंच तयार कपडे असा कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. आगीमुळे कंपनीतील सामानाचं मोठं नुकसान होऊन कोट्यवधी रुपयांची वित्तहानी झाली आहे.

दरम्यान, एवढ्या मोठ्या एमआयडीसी क्षेत्रात स्वतंत्र अग्निशामक यंत्रणा नसून पाणी साठवणूक क्षमताही नसल्याने अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारण्यास सुरु केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये पाणी संपत असल्याने पाणी भरण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्यांना सुमारे चार किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी भरून यावे लागत असल्याने आग पुन्हा भडकत होती.

(Fire control in Bhiwandi MIDC kapil Reyon after 10 hours)

हे ही वाचा :

छोटीशी आग नंतर शक्तिशाली बॉम्बस्फोट, तब्बल 1100 जणांचा मृत्यू

रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील कचरा प्रकल्पात भीषण आग, अग्निशमन दलाच्या 11 गाड्या दाखल

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.