AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट

"खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?" असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट
Anil Gote
| Updated on: Apr 27, 2026 | 2:06 PM
Share

“मी गेल्या पन्नास वर्षापासून संघ परिवारात आहे. माझ्या आठवणीप्रमाणे संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता” असा दावा माजी आमदार उबाठा गटाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. ‘भाजपासाठी हिंदूंचा नेता म्हणजे महाराणा प्रताप’ असं अनिल गोटे म्हणाले. अनिल गोटे हे आता उद्धव ठाकरे शिवसेनेत असले तरी त्याआधी ते भाजपात होते. भाजपकडून त्यांनी आमदारकी भूषवली आहे. धुळे जिल्ह्यातील ते भाजपचे महत्वाचे नेते होते. आता मात्र ते सतत भाजपवर हल्ला बोल करतात. नुकतचं बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होती.

आसाराम बापूंना कोणी वाढवलं?

‘असेही भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांशी काही घेणं देणं नाही’ असं गोटे म्हणाले. “राजकीय आश्रयाशिवाय बुवा आणि बाबा वाढू शकत नाहीत. अशोक खरात आला, कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींनी आसाराम बापूंना कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींना कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा उपयोग राजकीय ब्लॅकमेलिंग शिवाय होत नाही” असं अनिल गोटे म्हणाले. “खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?” असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

Follow Us
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.