AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट

"खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?" असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नव्हता, संघ परिवारातील माजी आमदाराचा गौप्यस्फोट
Anil Gote
| Updated on: Apr 27, 2026 | 2:06 PM
Share

“मी गेल्या पन्नास वर्षापासून संघ परिवारात आहे. माझ्या आठवणीप्रमाणे संघाच्या कार्यालयात 1985 पर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता” असा दावा माजी आमदार उबाठा गटाचे नेते अनिल गोटे यांनी केला आहे. ‘भाजपासाठी हिंदूंचा नेता म्हणजे महाराणा प्रताप’ असं अनिल गोटे म्हणाले. अनिल गोटे हे आता उद्धव ठाकरे शिवसेनेत असले तरी त्याआधी ते भाजपात होते. भाजपकडून त्यांनी आमदारकी भूषवली आहे. धुळे जिल्ह्यातील ते भाजपचे महत्वाचे नेते होते. आता मात्र ते सतत भाजपवर हल्ला बोल करतात. नुकतचं बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात एक वक्तव्य केलं. त्यावरुन आता मोठा वाद निर्माण झाला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना खूप थकले, म्हणजे त्यांना वाटलं की, आपण थकलो. एक दिवस ते रामदास स्वामी यांच्याकडे गेले. त्यांनी मुकूट उतारला आणि खाली ठेवला. आता आपल्याला युद्ध लढायचे नाही. हा मुकूट आपण सांभाळा, हा राजपाट आपण सांभाळा” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. नागपूरमध्ये भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास कार्यक्रमात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी हे वक्तव्य केलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर आणि संत मंडळी उपस्थित होती.

आसाराम बापूंना कोणी वाढवलं?

‘असेही भाजपाला छत्रपती शिवाजी महाराजांशी काही घेणं देणं नाही’ असं गोटे म्हणाले. “राजकीय आश्रयाशिवाय बुवा आणि बाबा वाढू शकत नाहीत. अशोक खरात आला, कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींनी आसाराम बापूंना कोणी वाढवलं? राजकीय व्यक्तींना कॅप्टन अशोक खरात प्रकरणाचा उपयोग राजकीय ब्लॅकमेलिंग शिवाय होत नाही” असं अनिल गोटे म्हणाले. “खरात जर दहा वर्षापासून हे उद्योग करत होता, तर मग गृह खात हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होतं, मग त्या ठिकाणचे आयुक्त यांना सस्पेंड का केलं जात नाही?” असा सवाल अनिल गोटे यांनी विचारला.

Follow Us
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा
अमित शहांच्या पुणे दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर; भाजप शहराध्यक्षाचा मोठा निर्णय
शिंद्यांचा आणि शिक्षणाचा संबंध आहे का?; राऊतांनी सरकारला धारेवर धरलं
Sanjay Raut | शिंद्यांचा आणि शिक्षणाचा काही संबंध आहे का?; संजय राऊतांनी सरकारला धारेवरच धरलं
तटकरे यांनी घेतली मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
दिल्लीत मोठ्या राजकीय हालचाली! सुनील तटकरे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; पवारांची राष्ट्रवादी NDA मध्ये येणार?
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर