AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर जेरबंद; या शहराने सोडला सुटकेचा निश्वास…

एक ते दीड वर्षापासून वाघांची प्रचंड दहशत शहरातही जाणवू लागली आहे. ही दहशत कायम राहिली असून अजून काही वाघांचा वावर आहे का त्याचीही आता वन विभागाकडून चालू करण्यात आली आहे.

ठाण मांडून बसलेली वाघीण अखेर जेरबंद; या शहराने सोडला सुटकेचा निश्वास...
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Mar 20, 2023 | 8:18 PM
Share

गडचिरोली : गेल्या अनेक दिवसांपासून गडचिरोलीमध्ये एका वाघाणीचा वावर असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. त्यावाघीणीला पकडण्यासाठी आज जोरदार मोहीम राबवून वाघाणीला जेरबंद करण्यात आले. साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर गडचिरोली शहरात शिरलेल्या वाघिणीला वनविभागाने जेरबंद केले. त्यामुळे आता नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गडचिरोली चंद्रपूर मार्गावरून एक वाघीण गडचिरोली शहरात आज दुपारच्या वेळेस आयटीआय कॅम्पसमध्ये शिरली होती.

वाघीण शहरात शिरल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले होते. ही घटना वनविभागाला समजताच पकडण्यासाठी सापळा रचून वाघाणीला जेरबंद करण्यात आले.

या वाघिणीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. वाघीण बघितल्यानंतर गडचिरोली शहरातही दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. वाघीणीचा वावर आहे असे समजल्यानंतर वन विभागानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. साडेचार तासाच्या प्रयत्नानंतर वन विभागाने अखेर वाघीण सायंकाळी जेरबंद करण्यात आले.

या वाघीणीला पकडण्यासाठी गडचिरोली वन विभाग व पोलीस विभागाने प्रयत्न केल्याने जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. वाघीणीली पकडण्यात आल्यानंतर जेरबंद झालेल्या वाघीणीला पाहण्यासाठी नागरिकांनीही प्रचंड गर्दी केली होती.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात जवळपास एक ते दीड वर्षापासून वाघांची प्रचंड दहशत आहे. ही दहशत कायम राहिली असून अजून काही वाघांचा वावर आहे का त्याचीही आता चौकशी सुरु करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात रविवारी कुरखेडा मालेवाडा महामार्गावर वाघांचे दर्शन काही नागरिकांना झाले होते. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी या भागात अनेक पट्टेरी वाघ व बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास आतापर्यंत 27 नागरिक ठार झाले आहेत.

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार